स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

Dec 16, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले आणि कृष्णाजी पाटील यांना म्हणाले आम्ही अनेक तीर्थ यात्रा करून आलो आहोत आमच्या बरोबर आमचे महाराज ब्रम्हगिरी सुद्धा आहेत.. आम्ही तीन दिवस इथे राहणार आहोत आमची सेवा करावी..आपण त्या महाराजांची सेवा करता अहो त्या पेक्षा आमची सेवा करा.. त्यांचे बोलणे ऐकून कृष्णाजी एवढेच म्हणाले कि आज तर आमच्याकडे भाकरी आहेत त्याचा स्वीकार करा उद्या शिरा पुरी देऊ..संध्याकाळी ब्रम्हगिरी बुवा नी प्रवचन सुरु केले अनेक वस्ती वरचे लोक प्रवचन ऐकण्यास आले होते.. त्यांनी प्रवचनास भगवद गीतेचा श्लोक घेतला ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ त्यावर निरूपण करू लागले.. त्यांचे निरूपण ऐकून लोकांना काही समजत नव्हते कि महाराज काय सांगत आहेत.. त्या मुळे सर्व लोक उठून श्री गजानन महाराजांकडे गेले.. हे सर्व पाहून गोसाव्याला राग आला.. तेव्हा श्री महाराज पलंगावर बसून चिलीम ओढत होते.. अचानक चिलिम मधील एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंगानी पेट घेतला.. हे सर्व पाहून तेथील लोक घाबरले आणि श्री महाराजांना खाली उतरण्याची विनवणी करू लागले.. भास्कर पाटील पाणी आणण्यासाठी जाऊ लागला तेव्हा महाराज म्हणाले अजिबात पाणी आणू नकोस.. हा सर्व प्रकार ब्रम्हगिरी सुद्धा पहात होते.. तेव्हा महाराज म्हणाले ब्रम्हगिरी महाराज या बसा माझ्या शेजारी पलंगावर बसा..आताच तुम्ही सांगितले ना.. ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ श्री महाराज भास्कर पाटील यांना म्हणाले जा घेऊन या बुवांना या पलंगावर..हे ऐकून बुवा घाबरले आणि पळून जाऊ लागले पण भास्कर पाटील यांनी त्याला पकडले आणि महाराजांकडे घेऊन आले.. महाराज त्यांना म्हणाले अहो आपण जो श्लोक सांगितले त्यावर जे विवेचन केले ते कृतीतून करून दाखवा..बसा या पलंगावर.. तेव्हा बुवा म्हणाले महाराज मला माफ करा.. मी पोट भरू संत आहे.. शिरा पुरी खाण्यासाठी मी संत झालो आहे..लोकांनी महाराजांना विनंती केली आपण खाली उतरा.. महाराज उतरे पर्यंत सर्व पलंग जळून गेला होता केवळ महाराज बसले होते तेवढा भाग मात्र चांगला होता.. ब्रम्हगिरी बुवा महाराजांच्या चरणी लीन झाले.. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला.. जर आपणस स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये.. बुवाला आपली चूक समजली तो.. महारांजाच्या चरणी लीन झाला.. अश्या रीतीने ब्रहागिरी बुवा विरक्त झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

बोध- वरील लीलेतून महाराज आपणस खूप खोल असे मार्गदर्शन करत आहे.. पहा अनेकदा आपणस एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसताना आपण असे दाखवतो कि मला खूप माहिती आहे.. हि गोष्ट अध्यात्म अनेकदा घडते..आपणस या गोष्टी पासून दूर राहायचे आहे.. तसेच आज आपण पाहतो कि अनेक जण अध्यात्मिक मार्गदर्शन करतात आपणस असे वाटते कि हा बरोबर तो चूक.. खरंतर आपणस कुणा वर टीका करायची नाही पण आपणस जागृत राहून ईश्वर सेवा करायची आहे.. कारण अनेक ब्रह्मगिरी बुवा आहेत.. आपणस श्री महाराजांची लीला आपल्या जीवनसाठी मार्ग दर्शन करत आहेत.. अनेकदा आपले असे होते कि बुवा प्रमाणे आपणास अनेक स्तोत्र मंत्र पाठ असतात.. आपल्यात अहंकार निर्माण होतो.. खरंतरं जो पर्यंत आपली आंतरिक शुद्धी होत नाही तो पर्यंत आपणास खरे ज्ञान मिळू शकत नाही.. त्या मुळे आपणस अनेक गोष्टी मध्ये न अडकता.. सहज सोपी साधना करायची आहे.. जसे रोज नाम जप करा.. शक्य असेल तर रोज एक अध्याय श्री गजानन विजय ग्रंथ वाचा.. आणि नुसता ग्रंथ न वाचता.. श्री महाराजांना प्रार्थना करा आम्हाला मार्गदर्शन करा.. पहा ज्या प्रमाणे बुवांना मार्गदर्शन मिळाले तसे आपणस हि मिळावे.. हाच बोध होतो.. बोला श्री गजानन महाराज कि जय.
चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया.. श्री महाराज ज्या प्रमाणे आपण ब्रम्हगिरी बुवाना योग्य मार्ग दाखवला.. आणि सत्याचे ज्ञान प्रदान केले.. असे ज्ञान आम्हाला प्रदान करा.. आम्हाला ज्ञानी नाही तर समर्पित भक्त बनवा.. आम्हाला इतर गोष्टीत न अडकण्याची बुद्धी द्या.. आपल्या नाम सेवेची सेवा द्या..बाकी काहीच नको.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...