Share

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक, तसेच धर्म संहिता 12 हजार श्लोक अश्या प्रकारे शिव महा पुराण कथा १ लाख श्लोकांची आहे…व्यासांनी आपल्या साठी २४ हजार श्लोकांची संक्षिप्त महा पुराण कथा लिहिली…शिव पुरणाचे स्थान ४ क्रमांकावर येते…यात सात संहिता आहेत..यातील पहिला संहिता विधवेश्वर संहिता आहे…दुसरी रुद्र संहिता, तिसरी शत रुद्र संहिता,चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता,सहावी कैलास संहिता, सातवी वायवीय संहिता.. याला शैव शिरोमणी भगवान व्यास यांनी संक्षिप्त शिव पुराण निर्माण केले..याचे सर्वांनी श्रवण पठण करावे.. शिव पुराणात काय आहे…भक्ती , घ्यान आणि वैराग्य यांचा उल्लेख शिव पुराणात येतो…जेव्हा सृष्टी ची उत्पत्ती सुरू होती..जे सहा महर्षी होते त्यांच्यात वाद निर्माण झाला।की अमुक एक।गोष्ट श्रेष्ठ…त्यांच्यातील।हा वाद इतका विकोपाला।गेला की ते सर्व ब्रम्हाजी यांच्याकडे गेले…आणि त्याना विचारले की सम्पूर्ण तत्व पेक्षा वेगळा पुराण पुरुष कोण आहे??तेव्हा ते म्हणतात देवाधिदेव महादेव..यांना प्राप्त करायचे असेल तर भक्ती करावी..सर्व देव यांचीच पूजा करतात…भव सागर पार करण्याची शक्ती शिव उपासनेत आहे..शिव भक्ती कशी करावी..कानाने श्रवण..मनाने मनन.. आणि मुखाने कीर्तन हे श्रुतीचे वाक्य आपणस प्रमाण भूत आहे..पराशर मुनी यांचे पुत्र..व्यास देवजी सरस्वती..नदी काठी साधना करत होते..एके दिवशी तिथे सनतकुमार येतात..त्यावेळेस व्यास देवजी ध्यानस्थ होते..काही वेळाने ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी..सनतकुमार यांना पाहिले…ते तात्काळ उठले.. त्यांचे आदर पूर्वक पुजन केले…आता व्यासजी.. सनतकुमार यांना सांगतात..तुम्ही शिव भक्ती करा..यात श्रवण मनन आणि कीर्तन करा..पूर्वी मी अनेक साधनांचा अवलंब केला आणि त्यात अडकलो..हाती मात्र काहीच आले नाही..पण जेव्हा मी भटकलो आणि मंदराचल पर्वतावर गेलो..तिथे मला शिव कृपेने..भगवान नंदिकेश्वर भेटले आणि त्यानी मार्गदर्शन केले..त्यांनीच मला मुक्ती चे साधन सांगितले…आपण ही सर्वांनी या तिन्ही साधनांचा अवलंब करा बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – शिव भक्तहो पहा श्री शिव महा पुराण हा ग्रंथ किती मोठा आहे.. व्यासांना त्याच वेळेस जाणवले असेल कि कल युगात लोकांना सोपे असे साधन निर्माण व्हावे त्यांना शिव तत्त्व काय आहे हे समजावे या साठी त्यांनी श्री शिव महा पुराण संक्षिप्त श्लोकात निर्माण केले.. तत्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.. या लीलेस निमित्त करून आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि त्यांना प्रार्थना करूया कि आमच्या कडून शिव महा पुराण कथा श्रवण मनन करून घ्या… पहा वरील लीलेत येते कि सृष्टी ची निर्मिती झाली तेव्हा महर्षी मध्ये वाद निर्माण झाला कि श्रेष्ठ कोण.. खरंतर हा वाद तर आपल्या दैनंदिन जीवनात रोज घालत असतो.. जसे मी जे म्हणतो किंवा करतो ते किती श्रेष्ठ आहे खरंतर अनेकदा हा आपले खूप मोठे नुकसान करत असतो कारण आपण करतो तेव्हा आपणस प्रेरणा देणारी कोणती तरी एक शक्ती असते पण आपण मात्र ते विसरून जातो आणि खोटा अहंकार बाळगतो.. थोडक्यात आपणास आपल्यातील खोटा अहंकार दूर करायचा आहे.. श्री शिव महा पुराण कथा आपणस श्रवण, पठण आणि कीर्तन हि सेवा करण्याची प्रेरणा देत आहे.. व्यास देव स्वतः सांगतात कि ते आधी अनेक सेवा करत होते पण त्यांना मुक्तीची मार्ग म्हणा किंवा सत्य मार्ग मिळत नव्हता पण जेव्हा शिव भक्ती करू लागले तेव्हा त्यांना समजले कि श्रवण मनन आणि कीर्तन हाच मुक्तीचा मार्ग आहे.. आपणस हि मार्गाचा अवलंब करायचा आहे.. पहा रोज थोडा बदल आपले आयुष्य बदलून टाकेल.. तरी सर्वानी या वर कार्य करावे हि विनंती… बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण सर्व मिळून महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझी भक्ती कशी करावी हे आम्ही जाणत नाही.. त्या मुळे नको त्या अनेक मार्गात आम्ही अडकतो.. आजच्या लीलेत सांगितल्या प्रमाणे आमच्या कडून श्रवण,, मनन आणि कीर्तन सेवा करून घे हीच प्रार्थना.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...