शिव पुराण कथा ४

Oct 8, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 4

शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात घ्यावे कारण सर्वांच्या विचाराने झालेले कार्य सफल होते.. आपण हि घरच्या घरी वाचणार असाल तर शक्यतो सर्वांना श्रवण करता  येईल असा मुहूर्त आपण शोधावा.. जर आपण शिव मंदिरात किंवा इतर ठिकाणी करणार असाल तर याबाबत अनेक शिव भक्तांना याचा लाभ घेता येईल अशी काळजी घ्यावी.. शिव पुराणात वर्णन येते कि केळीच्या खुंटाचा मंडप असावा.. आज आपण विचार केला तर आज अनेक मंडप आहेत.. हॉल आहेत अनेक सुविधा आहेत त्याचा आपण वापर करू शकतो.. जेणेकरून ऊन , वारा , पाऊस याचा व्यत्यय कथेत येणार नाही.. कथेच्या ठिकाणी भगवान शिव यांच्या साठी आसन  असावे.. आता यात आपला भाव महत्वाचा कारण मग आपल्या मनात प्रश्न येईल असेच आसन हवे तसे नको.. इथे आपण फुलाचे आसन करू शकतो.. आता आपण जी कथा श्रवण करणार आहोत त्या ग्रंथासाठी हि उच्च आसन असावे .. म्हणजे काय तर ग्रंथ वाचताना त्या खाली चौरंग, पाट किंवा आणखी कोणते आसन असावे.. याचा फायदा जे वाचणार आहेत त्यांना हि वाचताना सोपे झाले पाहिजे.. आपल्या कडे प्रथा आहे कि ग्रंथ आणि ग्रंथ वाचक यांचे आसन नेहमी उच्च असावे आता.. यामागचे कारण आपल्यात अधिकाधिक भक्ती भाव जागृत व्हावा.. जे कथा वाचणार आहेत त्यांनी त्या ग्रंथानुसार आचारण करण्याचा प्रयत्न करावा कारण.. शिव पुराण हा नुसता ग्रंथ नसून ते शिव तत्त्व आहे.. शिव पुराण  मुळातच आपणस शुद्ध चित्त ठेवण्यास सांगते.. आता इथे आपल्या मनात प्रश्न येईल कि आम्ही तर प्रथमच शिव पुराण घरात वाचत आहोत.. मग आम्हाला कसे कळणार.. शिव पुराण वाचले कि आपणास आपल्यातील दोष जाणवतात.. ते दोष दूर केले म्हणजेच नियमांचे पालन झाले.. शिव पुराण मध्ये सांगितले आहे कि जे कुणी कथा वाचणार आहेत जर त्यांना काही अडचण आली तर दुसरे कुणीतरी ती कथा वाचू शकेल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी.. आता कथेस सुरवात करण्यापूर्वी.. आपण आवश्यक त्या प्रार्थना जसे गणपती पूजा, ग्रंथ पूजा करावी.. काहीच शक्य नसेल तर भगवान महादेवांना प्रार्थना करावी कि आपल्या कृपने आम्ही ग्रंथ वाचन श्रवण करत आहोत आमच्याकडून सेवा करून घे.. शुद्ध भाव ठेवून कथा श्रवण किंवाव वाचन करावी असा उल्लेख श्री शिव महा पुराण  मध्ये येतो.. सात्विक अन्न ग्रहण करावे.. आता सात्विक अन्न म्हणजे असे अन्न  ज्याने आपले पोट नरम राहील शरीरात ऊर्जा असेल असे अन्न.. कथा श्रवण आणि वाचन याचे व्रत घेतले कि त्या बरोबर आणखी एक व्रत घेण्याचा उल्लेख श्री शिव महा पुराणात येतो.. ते व्रत म्हणजे काम, क्रोध , मोह, मंद मत्सर आणि घृणा याचा त्याग करावा.. कुणाची निंदा करू नये.. सत्य , मौन , सरळ आचरण, विनम्रता त्याच प्रमाणे मनात कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवता याचे श्रवण पठण करावे.. कथेची सांगता करताना आपल्या क्षमते नुसार अन्न दान करावे.. तसेच रोज शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा ‘ॐ नमः शिवाय’ आता सर्वांच्या मनात प्रश्न असतो कि कथा वाचून किंवा श्रवण करून काय होईल.. खरं सांगु काहीच होणार नाही जर आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर.. कारण श्री शिव महा पुराण कथा आपणस आपल्या स्वतः वर काम करण्यास शिकवते.. पहा जेव्हा आपण आपल्यात बदल करू तेव्हा नक्कीच श्री शिव महा पुराण कथेच्या श्रवण पठण याचा जो काही फायदा होईल तो आपला आपल्यालाच जाणवेल.. नक्की आपण वाचण्याचा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा.. आणि नसते वाचन किंवा श्रवण न करता त्या नुसार आपल्यात बदल करावा.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’

चला आपण सर्व मिळून श्री महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझे चरित्र वाचन किंवा श्रवण करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दे.. जसे तुझ्या चरित्रात वर्णन येते त्या नुसार आमच्या जीवनात… आमच्या स्वतः मध्ये बदल करण्याची बुद्धी आम्हाला दे.. कारण तुझे चरित्र तर आम्हाला आमच्यातील दोष करण्याची प्रेरणाच देत आहेत.. धन्यवाद महादेवा… हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...