अक्कलकोटी आलो देवा

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७)

आजचे चिंतन-मनन

अक्कलकोटी आलो देवा ,
तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा !
अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,
प्रसादरूपे दिलासी !

www.SwamiVaani.com

आजचे चिंतन-मनन

अक्कलकोटी आलो देवा ,
तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा !
अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,
प्रसादरूपे दिलासी !

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी म्हणजे प्रार्थना आहे.. आपण सर्वजण अक्कलकोट ला जातो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी.. खरंतर हि स्वामी कृपाच आहे.. समर्था तुझ्या कृपेनेच तुझ्या द्वारी येण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.. खूप खूप धन्यवाद.. तुझे दर्शन आज मनाला खूप खूप आनंद झाला.. इथे कधी कधी आपली चूक होते आपण कुठल्याही स्थळी जातो तिथे स्वामी दर्शन घेण्यापूर्वी फोटोच काढत बसतो.. सरश्री नेहमी सांगतात जेव्हा आपण जिथे कुठे जाल तिथला अनुभव जो आहे त्याचा आनंद घ्या पण आपण काय करतो फोटो काढत बसतो..असे न करता आपण जिथे जाल तिथला अनुभव अनुभवा.. स्वामी च्या दर्शना ला गेलात तर स्वामी नाम घ्या.. थोडा वेळ स्वामी नामाचे ध्यान करा.. आपण जेवण केले कि कसे म्हणतो पोटभर जेवण करून तृप्त झालो.. पण हि तृप्ती दुसऱ्यादिवशी परत निर्माण होते.. स्वामी दर्शन घेताना.. सेवा करताना अशी करा कि हि दर्शनाची तृप्ती आपली.. कायम असावी.. स्वामी आपणास अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा प्रसादरूपे देत आहेत आपणस तो जतन करायचा आहे.. तो आपण जतन कसा करू शकतो तर त्यासाठी आपणस सेवेत सातत्य असणे आवश्यक आहे.. आपण जसे रोज जेवण करतो.. रोज झोपतो.. तसेच असा एकही दिवस जाऊ नये ज्या दिवशी आपली स्वामी नाम सेवा होणार नाही..स्वामी भक्तहो स्वामी नाम सेवा करा.. रोज स्वामींना प्रार्थना करा स्वामी आमच्याकडून सेवा करून घ्या.. स्वामी सेवेचा विशिष्ट असा संकल्प घ्या.. स्वामी सेवेत सातत्य ठेवा.. नक्कीच स्वामी सेवा करून घेतील.. धन्यवाद स्वामी.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...