दत्त येऊनिया ऊभा ठाकला

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९)

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ,
सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ||

– श्री दत्त महाराजांची आरती
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा पासून श्री दत्त प्रभूंच्या आरती चे कडवे मी म्हणत आहे..आपण ही म्हणत।असाल..पण जेव्हा यावर चिंतन मनन करण्याची आज वेळ आली.. काहीच चिंतन झाले नाही..मग स्वामीं मार्ग दाखवतात.. आणि एका क्षणात स्वामीं नी एका स्वामीं भक्ता मार्फत उत्तर दिले..सर्व प्रथम त्यांना धन्यवाद..ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली असे म्हंटले जाते..या बाबत आपणस माहिती असेल तर आपण सांगावे..भाव इतका खोल आहे की..तो शब्दांत नाही..हे आरतीचे कडवे म्हणजे अनुभव.. दत्त येऊनिया उभा ठाकला..इथे दत्त म्हणजे..परमेश्वराची अनुभीत…आपण म्हणतो संकटात कुणी मदत केली की..दत्ता सारखा उभा राहिलास..म्हणजेच आपल्या ध्यानी मनी नसताना कुणी तरी मदत करते..स्वामीं अनुभूती सुद्धा अशीच आहे..कोणतीच अपेक्षा न करता आपण जेव्हा स्वामीं सेवा करतो..नाम घेतो..नामातून आपण सहज ध्यानात प्रवेश करतो..ध्यानात कधी आपणस स्वामीं अनुभव येतो..आपणस ही कळत नाही..या अनुभूती मध्ये.. फक्त स्वामीं आणि आपणच असतो..या अवस्थेत जेव्हा आपण असतो..ती अवस्था म्हणजे स्वामीं च्या प्रसन्न मुद्रेची अवस्था..स्वामीं यात आशीर्वाद देतात..ही अवस्था म्हणजे.. जन्म आणि मृत्यू च्या पली कडची अवस्था..स्वामीं महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला ही अवस्था मिळावी असे स्वामीं आईचे नियोजन आहे..फक्त गरज आहे..अखंड स्वामीं नाम सेवेची..स्वामीं भक्तहो..चला आपण सर्व मिळून स्वामींना प्रार्थना करूया..हे समर्था..आज या आरतीतील भावाला निमित्त करून आमच्यात जो भक्ती भाव जागृत केलास त्याबद्दल धन्यवाद.. तुझी तर इच्छा आहे की प्रत्येकाला स्वामीं तत्वाची अनुभूती द्यावी..परंतु माझे मन त्यात बाधा निर्माण करते..कृपा।कर माझ्या मनाची चावी तुझ्याकडे घे.. आमच्याकडून अखंड स्वामीं नाम सेवा..अखंड ध्यान सेवा करून घे…कारण तुझ्या इच्छे शिवाय हे होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..धन्यवाद चिंतन मनन करून घेतल्याबद्दल.. धन्यवाद प्रार्थना करून घेतल्याबद्दल..!


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...