सज्जन कुणाला म्हणावे ?

Feb 4, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२)

आजचे चिंतन-मनन

सज्जनांचे सज्जनत्व वाढव !
दुर्जनांचे दुर्जनत्व घालव !
अवघे विश्व स्वामीमय होवो !
हेचि मागणे समर्था !!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो कि आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि सज्जन नेमके कुणास म्हणायचे.. आपल्या मनात एक व्याख्या असते आणि व्यक्ती नुसार ती बदलत असते.. पण मग सज्जन कुणास म्हणावे.. स्वामी तुम्हींच यावर चिंतन मनन करून घ्या.. प्रत्येक व्यक्ती हि सज्जनच असते.. कारण प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगले बनायची लालसा असते.. अशी एक व्यक्ती नाही कि तिला दुर्जन बनून आनंद होतो पण तो वेळेनुसार आपल्यात बदल करतो आणि स्वतःला दुर्जनांच्या यादीत बसवतो..आपण सज्जनांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया ” जो कोणत्याही परिस्थितीत स्वामींना भूषणावह असेच आचरण करतो तोच सज्जन” पहा आपला काही तरी व्यक्तिगत फायदा होत आहे पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते आहे तरीही आपण आपल्या फायदा व्हावा या साठी चुकीचे वर्तन करतो तेव्हा आपण सज्जनांच्या भूमिकेतून दुर्जनांच्या भूमिकेत जातो .. आता आपल्या सर्वांच्या मनात येते कि जर आपण वेळेनुसार आम्हीं तसे वागलो नाही तर आमचे कोणतेच काम होऊ शकत नाही मग आम्ही काय करायचे.. पहा जेव्हा आपण अडचणीत असतो आणि तेव्हाही संयम बाळगतो थोडे थांबतो आणि मग निर्णय घेतो नक्कीच स्वामींना भूषणावह निर्णय घेत असतो.. जेव्हा आपल्या मनात संभ्रम असेल तेव्हा थोडे शांत व्हा स्वामींना प्रार्थना करा मार्गदर्शन करा.. पहा आपला निर्णय हा स्वामींना भूषणावह म्हणजे सज्जन माणसाचा असेलसुरवातीला अवघड वाटेल पण नंतर आपणस यात यश.. जेव्हा प्रत्येक जण असा प्रयत्न करेल तेव्हा सर्व दुर्जनांचे दुर्जनत्व दूर होणार आहे.. आपल्या मनात येते मी एकटा चांगला वागून काय फायदा.. पहा पत्त्याचा बंगला असतो.. त्यातील एक पत्ता काढला तर बंगला पडतो तसेच आपण आपल्यातील दुर्गुण काढला तर इतर लोक हि आपल्यातील दुर्गुण काढतील..सज्जन होतील.. आणि संपूर्ण विश्व् हे स्वामी मय होईल.. पहा किती सुंदर नियोजन आहे आपल्या स्वामींचे फक्त गरज आहे आपल्यातील दुर्गुण काढून चांगले गुण धारण करण्याची म्हणजेच आपल्यात स्वामींना भूषणावह असणारे सज्जनांचे गुण आपल्यात धारण करण्याचा.. चला तर मग आपल्या स्वतःवर कार्य करूया.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...