क्षमा म्हणजे काय ?

Jan 31, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)*

*आजचे चिंतन-मनन*

जया अंगी क्षमा भाव करुणेचा !
ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !!
म्हणोनि चुकलेल्या माफ करावे !
चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी म्हणतो..कुणी सॉरी म्हंटलं की..इंग्रजीत आपण It’s ok किंवा अजून काही म्हणतो..इतकाच अर्थ आहे का क्षमा या शब्दाचा..यांवर आपण चिंतन मनन करणे खूप आवश्यक आहे..जो पर्यंत आपण क्षमा या शब्दाचा अर्थ समजून घेत नाही तो पर्यंत क्षमा हा गुण आपण आपल्यात धारण करू शकत नाही..जो पर्यंत हा गुण धारण करत नाही..तो पर्यंत स्वामीं च्या जवळ आपण पोहचू शकत नाही..पहा आपण आपल्याकडून काही चुकी झाली तर आपण।ह्रदयातून माफी मागतो का ? हा प्रश्न आज स्वतः ला विचारायचा आहे? उत्तर हो आले तर खूपच छान..नाही आले तर..यांवर चिंतन करा असे का होत आहे.. आता काही म्हणेल मी सर्वांची माफी मागू शकतो..सर्वांना माफ ही करू शकतो पण एका व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही..याचाच अर्थ आपल्यात क्षमा हा गुण अजून अवगत झाला नाही..पहा जर आपण यात व्यक्ती नुसार बदल केला तर आपण कधीच कुणालाच माफ करू शकणार नाही.. पहा आज पर्यंत आपण ही अनेक चुका केल्या असतील..करत ही असतो..आपल्याला आपल्या आई वडिलांनी माफ केले की नाही.. आपण आपल्या मुलांना माफ करतो की नाही..मग आपण सर्वांना माफ का नाही करू शकत..आपले चुकत असेल..आपले चुकले असेल तर आपण माफी का नाही मागत..कारण आपल्यातील अहंकार जागृत आहे.. जर आपल्यात अहंकार असेल तर आपण स्वामींच्या जवळ कसे जाणार..जाऊच शकत नाही..म्हणून आज या क्षणापासून हा गुण धारण करा..त्यावर काम करा..पहा कसे छान वाटते..इथे आणखी एक महत्वाची गोष्ट स्वतःला ही माफ करा..कारण अनेकजण स्वतःला माफ करत नाहीत..मनातल्या मनात कुढत राहतात..तुमच्याकडून चुकी झाली.. झालेली चुकी ची माफी मागा..नाही मागू शकत स्वामीं समोर मागा.. पहा किती मोकळे।मोकळे वाटते..क्षमा करणे व क्षमा मागणे हे स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे..या मार्गाचा जो अवलंब करतो तो स्वामीं चा सदैव प्रिया भक्त होतो…आपल्या सर्वांना स्वामीं चा प्रिय भक्त व्हायचे आहे ना! मग एकच उपाय..क्षमा करा..क्षमा मागा..चला।आजपासूनच या सेवेला सुरवात करूया..स्वामींच्या जवळ रोज क्षमा प्रार्थना करूया..हे समर्था मला माफ..आज पर्यंत क्षमा मागितली नाही त्याबद्दल माफ कर…आमच्यात क्षमा हा गुण वाढव..आम्हाला सर्वांना माफ करण्याची शक्ती दे..समज दे..आम्हाला स्वतःला माफ करण्याची समज दे..आज पर्यंत आमच्याकडून जाणते..अजाणतेपणी कुणाचेही मन दुखावले गेले असले तर आम्हाला माफ कर..आमच्या मनातून त्या व्यक्तीबद्दल आदर भाव..प्रेम निर्माण कर..हे तुझ्या कृपे शिवाय शकय नाही..कृपा कर.. ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...