स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

Jan 30, 2023 | Uncategorized

Share

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड आहे..आपणस वाटते की स्वामीं नाम जप केला व स्वामींचे स्तोत्र वाचले की झाली सेवा..काहींना वाटते की अजूनही काही इतर देव..देवतांचे स्तोत्र म्हंटलं नाही तर स्वामीं सेवा पूर्ण होत नाही..मग आपण यात आणखी सेवा ऍड करतो..पहा प्रत्येक सेवा ही परिपूर्णच आहे..असे नाही की अमुक मंत्राचा जप केला तरच ती स्वामीं सेवा..म्हणजेच कोणतीही सेवा करा पण ह्रदयातून करा..फक्त स्वामीं नाम घेतले तरी ती स्वामीं ची परिपूर्ण सेवा आहे..पण आपले मन नेहमी सगळी खिचडी करते..ही सेवा केली तर असे होईल..नाही केली तर असे होईल..पहिला हा  चुकीचा विचार मनातून काढून टाका.. आपण कोणतीही सेवा करा पण मनापासून करा..तुम्ही स्वामीं म्हणा, राम म्हणा किंवा श्री स्वामीं समर्थ म्हणा..प्रत्येक हाकेला स्वामीं ओ देतातच.. फक्त ती हाक ह्रदयातून हवी..आता हे झाले सेवेचे.. पण ही सेवा अपूर्ण आहे..जर आपण कर्म आणि सेवा यात भेद करत असू तर..कारण स्वामीं नी आपणस जे प्रापंचिक काम दिले आहे..ते जर आपण फक्त काम म्हणून पहात असू तर आपण स्वामीं सेवा ह्रदयातून करत नाही.. म्हणजेच आपणस जे काम मिळाले आहे ती सुद्धा स्वामीं सेवा आहे..ते काम करताना आपले भाव जर नकारात्मक असतील तर..आपली स्वामीं सेवा ही कायम अपूर्ण असते.. आपल्यावर स्वामीं कृपा होऊच शकत नाही.. म्हणून नेहमी आपण जे काही काम करता त्यात स्वामीं सेवेचा भाव ठेवा..आपण गृहिणी आहात.. तर आपले कर्तव्य आहे की घरातील काम हे स्वामी सेवा म्हणून करा..पहा आनंद मिळेल.. नाहीतर आपणस कायम वाटत राहील मला सुट्टी च नसते..अहो स्वामीं सेवेकरी तोच जो म्हणतो..धन्यवाद स्वामीं मला सेवेची संधी दिली…हेच आपण जी काही नोकरी करतो काम करतो याला सुद्धा लागू होते.. जर आपण काम चुकार पणा करत असू..आपले आचरण हे भ्रष्टाचार करणारे असेल तर..आपण कितीही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर ती स्वामीं सेवा कधीच असू शकत नाही..पण आपले आचरण शुद्ध असेल आपण आपल्या प्रत्येक कर्मास स्वामी सेवा मानत असाल तर नक्कीच आपलीं स्वामीं सेवा ही नित्यसेवा आहे..स्वामीं कृपेचा वर्षाव आपल्यावर होत आहे..खरंतर हा आपण स्वतः चिंतन मनन करण्याचा विषय आहे..यावर आपण अधिक चिंतन मनन करा..अजूनही काही प्रश्न असतील विचारा..नक्कीच आपण त्यावर चिंतन मनन करूया..स्वामीं ना अपेक्षित अशी स्वामीं सेवा करूया..स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म करूया..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...