ध्यान म्हणजे काय?

Sep 21, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

 

 

ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ आहे..आणि मग ध्यान ध्यान न राहता एक तांत्रिक पद्धत बनते..खरंतर ध्यान म्हणजे सृष्टीची अशी व्यवस्था ज्यात आपण..आपल्या स्व अवस्थेवर जाण्यासाठी केलेला प्रयत्न..म्हणजेच काय ज्या अवस्थेत आपण आपल्या स्वतःशी संवाद साधू शकतो अशी पद्धती म्हणजे ध्यान..असो..जशी व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच प्रत्येकाची ध्यान करण्याची वेगळी वेगळी पद्धती असणार..आणि ती चुकीची असू शकत नाही..म्हणून सर्वप्रथम आपणस अमुक एक पद्धतीच योग्य असा जर आपल्या मनात असेल तर आपणस सर्वप्रथम काढून टाकायचा आहे..कारण ध्यानाची सुरवातच विना अट होते..
ध्यानात सुरवातच मुळात मनावर होते..आपण ध्यान करण्यास सुरुवात करतो..आपले मन पहिल्या दिवशी विरोध करत नाही..पण एक दोन दिवसात आपणस नको नको वाटते..आपले मन आज नको उद्या करू असा प्रतिसाद देते..म्हणुन सर्वप्रथम आपणस मन नाही म्हंटले तरी ध्यान करण्यासाठी बसायचे आहे..ध्यान करण्यास बसले की मनात विचारांचा काहूर सुरू होईल..जसे विचार येतील तसे जातील ही..पण आपले काय होते..मी आज ध्यान केले म्हणजे लगेचच माझे मन निर्विचार झाले पाहिजे..खरंतर असे एका दिवसात होऊ शकत नाही..या साठी अनेक वर्षे आपणस दयावे लागतील..काही जण ध्यान या मुळे करत नाहीत कारण मनातील विचार थांबत नाहीत..खरंतर आपण कधीच निर्विचार होणार नाही मग आपण कधीच ध्यान करणार नाही का..सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका की..ध्यान करताना विचारच मनात आले नाही पाहिजे..जसे विचार येतील तसे ते निघूनही जातात..फक्त गरज आहे आपण बसण्याची..आता मनात प्रश्न येतो की ध्यान किती वेळ करावे.. दिवसातील किमान २० मिनिटे आपण ध्यान करावे…सुरवातीला ही वेळ खूप मोठी वाटेल..पण सराव केल्यानंतर ही वेळ फार कमी वाटेल..म्हणून आज पासून किमान २० मिनिटे स्वतः साठी देऊया…ध्यान करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुठे बसून ध्यान करावे.. कसे बसावे..खरंतर ज्या ठिकाणी २० मिनिट आपण बसू शकतो..ज्या आसनात आपणस त्रास होत नाही..अश्या ठिकाणी..आसनात बसून ध्यान करावे…मग खुर्चीवर बसूनही आपण ध्यान करू शकतो…
आता ध्यान कोणते करावा हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो..खरंतर वर सांगितल्याप्रमाणे आपणस जे योग्य वाटेल..त्या पासून सुरवात करा..सुरवात महत्वाची..इथे पद्धती सांगत आहोंत..
१)श्वासावर ध्यान- यात आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो..म्हणजे आपणस डोळे मिटून बसायचे.. मोबाईल।मध्ये २० मिनिटांचा टाईमर लावा.. हळूहळू डोळे बंद करा..आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा..आपणस लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे..अनेकदा आपले लक्ष विचलित होते..परत आपणस त्याला श्वासावर केंद्रित करायचे आहे..ही पद्धत आपण वापरू शकता..!
2) दुसरी पद्धत प्रत्येकाची कोणत्या तरी देवावर श्रद्धा..विश्वास असतो..आपण त्या देवतेचा मंत्राचा जप करत असतो..जसे श्री स्वामी समर्थ..इथे आपणस आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जप श्वासावर करायचा आहे..इथे जप।मोजायचा नाही..फक्त प्रत्येक श्वासावर जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे..प्रत्येक नामावर आपणस अधिकाधिक नामावर ध्यान करायचे आहे…ही खूपच छान अशी ध्यानाची पद्धती आहे..!
आपण आपणस जी योग्य वाटेल.. ती पद्धत आपण निवडू शकता..गरज आहे फक्त ध्याना साठी बसण्याची.. बाकी सर्व समर्थ करून घेतात..!
चला आपण समर्थांना ध्यानासाठी प्रार्थना करूया…!
हे समर्था..आज ध्यानवर चिंतन.. मनन करून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..ह्रदयात तुझा वास आहेस..परंतु दिसत नाहीस..त्या दर्शनासाठीचं तर ध्यानाची सुविधा तू निर्माण करून दिली आहेस..माझ्या मनाला ध्यानासाठी तयार कर..आम्हाला ध्यानावर स्थिर कर…आमचा प्रत्येक श्वास स्वामीमय बनव..ही समज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...