श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 6, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

उन्हाळ्याचे दिवस होते… श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते…त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता… तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता… आंब्याचे दिवस होते… त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते… महाराजांनी एक दोन आंब्याच्या फोडी खाल्या… अचानक श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस म्हणाले… चंदू मला आंबे नकोत… तुझ्या घरी उतरंडीला दोन कान्होले ठेवले आहेत ते घेऊन ये… मला ते खायचे आहेत…श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज कान्होले नाहीत घरी तयार…आपली अनुमती असेल तर मी ताजे कान्होले तयार करून आणतो… श्री महाराज चिडून म्हणाले… गुरूंशी खोटे बोलू नकोस… जा लवकर… उपस्थित लोकांनी चंदू ला सांगितले कि महाराज अंगात आहेत त्या प्रमाणे घरी जाऊन पहा… श्री श्री चंदूमुकीम घरी जाऊन आपल्या पत्नीस सर्व सांगतात… तेव्हा त्यांची पत्नी म्हणते… अहो एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे.. आपल्या घरात कान्होले नाहीत… ती म्हणाली अहो आपल्या घरात सर्व सामान आहे… मी लगेचच ताजे कान्होले तयार करते… तेव्हा श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज म्हणत आहेत त्या प्रमाणे तू उतरंडीला तपासून पहा… असे म्हण्टल्या नंतर एकदम तीला आठवेल आणि ती तिच्या पतींना म्हणाली..समर्थ जे म्हणत आहेत ते खरे आहे… अहो मी खापराच्या कळशीत २ कान्होले ठेवले होते… व ती कळशी उतरंडीला ठेवली आहे… परंतु ते कान्होले आत खराब झाले असतील… श्री चंदूमुकीम यांनी उतरंडी वरील ती खापराच्या कळशी काढली… ती कळशी काढून त्यातील कान्होले पाहले तर.. ते कान्होले ताजे तवाने होते.. ते खराब झाले नव्हते… ते कान्होले घेऊन ते लगेच महाराजांकडे जातात… सर्वांना महाराजांच्या वाणीचा अनुभव येतो … सर्वजण एका घोषात महाराजांचा जय जयजय कार करतात !!

बोध – वरील लीला म्हणजे महाराजांच्या अंतःसाक्षीत्वाची अनुभूती देणारी लीला आहे…उपरोक्त लीलेत उतरंडीस कान्होले ठेवले होते… उतरंडी म्हणजे अशी जागा कि सहसा आपले लक्ष जात नाही … खरंतर वरील लीला एक निमित्त आहे आपल्याला समज देण्यासाठी… जसे कान्होले होते घरातच पण त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते… त्याच प्रमाणे आपल्या मध्ये देखील काही नकारात्मक गुण असतात जे आपल्या मनाने झाकलेले असतात त्याचे आपणस कधी दर्शन होत नाही… महाराज आपल्या जीवनात दुःख संकट देऊन आपणस काम करण्याची संधी देत असतात.. पण जसे वरील लीलेत श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस सांगत होते उतरंडीस कान्होले आहेत ते मला हवे आहेत… पण श्री चंदूमुकीम यांचे नकारात्मक मन त्यास विरोध करत होते… पण त्यांची भक्ती उच्चतम होती त्यामुळे त्यांना महाराजांच्या अंतःसाक्षित्वाची अनुभूती आली.. आपण हि श्री चंदूमुकीम यांच्या प्रमाणे विरोध करतो… आणि आपल्यातील नकारात्मक सवयी… विचार यावर काम करण्यास तयार होत नाही… आणि आपण आलेले संकट वा दुःख यांस केवळ नकारात्मक विचारांतून पाहतो … त्यामुळे आपल्यातील भक्ती ची पातळी खालावते… खरंतर आपल्या जीवनात जर संकट वा दुःख आले तर आपणस वरील लीलेतील उतरंडी ची आठवण करायची आहे… जी आपणस सांगत आहे… दुःख व संकट फारच कमी आहे… फक्त गरज आहे थोडेसे वरती डोकावून पाहण्याची… जर आपण आपले विचारात सकारात्मकता आणली तर… जसे श्री चंदूमुकीम यांना खापराच्या कळशीत कान्होले सापडले तसे… आपल्या जीवनात देखील यशरूपी कान्होले आपणस प्राप्त होतील… धन्यवाद महाराज … कोटी कोटी धन्यवाद !!
चला आपण त्यासाठी श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था आजची तुझी लीला तर आमच्या साठी दृष्टिदान आहे… आम्ही तर नकारात्मक विचार करतो.. पण वरील लीलेतून तू आम्हास संकटाकडे पाहण्याची दृष्टी दिलीस त्या बद्दल धन्यवाद… इथून पुढे आम्ही प्रत्येक संकटाकडे वा दुःखाकडे नव्या आशेच्या किरणाने पहावे अशी दृष्टी आम्हाला दे… एक संधी म्हणून प्रत्येक संकटाकडे पाहण्याची बुद्धी दे… हे समर्था हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...