श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Feb 13, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली…. खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती… परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच… पण उलट श्री महाराजां बद्दल अश्रद्धा युक्त शब्द उच्चारले… असो त्याच दिवशी श्री जानकीराम यांच्या कडे श्राद्ध होते …श्राद्ध विधी साठी त्यांनी अनेक लोकांना बोलावले होते… श्राद्ध पूजा साठी त्यांनी सर्व स्वयंपाक केला होता …त्यात मुख्य असते ती खीर आणि वडा हे पदार्थ सुद्धा त्यानी बनवले होते… श्राद्ध पूजा पूर्ण झाली ..आता भोजन करण्याची वेळ आली.. सर्व जण जेवण करण्यासाठी बसले सर्व पदार्थ वाढण्यात आले खीर वाढण्यासाठी श्री जानकीराम यांनी पातेले हातत घेतले तर.. त्यांना खिरीत काही तर वळवळ करताना दिसले …त्यानी व्यवस्थित पाहिले तर त्यांना दिसले कि संपूर्ण खिरीच्या भांडयात त्यांना अळया दिसू लागल्या.. हे सर्व पाहून सर्व लोक जेवण न करताच तसेच निघून गेले..  हे सर्व कसे झाले यावर त्यानी विचार केल्या नंतर त्याना असे वाटले कि आपण श्री महाराजांना अग्नी दिला नाही …तसेच त्यांच्या बद्दल अपशब्द बोललो त्या मुळे हे घडले असावे… हा विचार क्ररुन ते श्री महाराजांकडे गेले तिथे बंकटलाल होते.. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याना विनंती केली कि मला श्री महाराजकडे घेऊन चला… मला त्याची माफी मागायची आहे… बंकटलाल त्याना श्री महाराजांकडे नेतात श्री महाराजांकडे जाताच जानकीराम क्षमा प्रार्थना करतात …महाराज आपण साक्षात उमानाथ आहात… मला माफ करा… आज माझे सर्व संशय दूर झाले ..माझे अपराध पोटात घ्या… इथून पुढे मी कुणाचीच मजाक करणार नाही… कुणाची टीका करणार नाही.. मला आज जी शिक्षा दिलीस ती पुरी आहे… तू अनाथांचा नाथ आहेस… आता माझा अंत पाहू नकोस… महाराजांनी श्री जानकीराम यांच्याकडे पाहिले आणि बोलले.. अरे आन इकडे ते खिरेचे भाडे अरे यात अळया नाहीत… उलट तुझी खीर खुपच मधुर आहे …महाराजांची हि लीला पाहून सर्वाना महाराजांच्या अंत साक्षीत्वाचा अनुभव आला सर्वानी एक घोषात महाराजांचा जय जय कार केला.

बोध – वरील लीला म्हणजे आपल्या मनाला शिकवण आहे.. श्री जानकी राम यांच्या मनात जश्या शंका येत होत्या… अश्या अनेक शंका आपल्या मनात आपण अडचणीत असताना येत असतात… नक्की महाराज माझे काम करतील का ? अनेकदा आपण इतक्या अडचणीत असतो कि आपण कळत न कळत महाराजांन बद्दल शंका मनात निर्माण होते … खरे तर त्या वेळेस आपल्यातील जानकीराम जागृत असतो.. आणि तो आपणस महाराजांपासून दूर नेत असतो ..आणि आपण कधी दूर जातो हे आपणस हि कळत नाही.. वरील लीलेत खिरीत अळ्या झाल्या असे श्री जानकी राम यांना दिसल्या.. यातून महाराज आपणस सांगत आहेत ..अरे जश्या त्या खिरीत अळ्या झाल्या त्या मुळे ती खीर खाण्यास लायक नाही ..त्याच प्रमाणे आपल्या मनात.. विचारात जी बाधा आहे… ती असेल तर आपण खरी भक्ती करू शकत नाही… त्या साठी आपणस आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे… जेणेकरून मनातील अळ्या म्हणजे कुविचार जातील… आणि आपण आपले लक्ष प्राप्त करू शकू ..खरे तर महाराजांची प्रत्येक लीला हि आपल्या साठीच आहे.. फक्त गरज आहे त्यावर चिंतन मनंन करण्याची व त्या नुसार काम करण्याची चला तर मग आपण महाराजांना प्रार्थना करूया !!

श्री गजानन महाराज आजच्या लीलेस माध्यम करून… आज आपण आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवलेत.. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. खरे तर आम्ही अनेक काम करतो ..पण कधी स्वतःच्या मनावर कार्य करत नाही.. कारण माझे मन नेहमी सांगते कि मीच बरोबर आहे.. आणि हि जी ..मी ..मी ..ची बाधा आहे.. तीच मला तुझ्या सत्य स्वरूपा पासून दूर नेते.. जसे जानकीराम यांच्यावर कृपा केलीत तशी कृपा आमच्यावर करा… माझे मन मी ..मी च्या ऐवजी …तुझ्या नामाचा धावा करेल ..अशी शिकवण माझ्या मनाला दे.. कारण जेव्हा मन तुझ्या नामात अडकेल.. तेव्हा ते मी ..मी करणार नाही.. आणि त्यामुळे तुला अपेक्षित असणारी अभिव्यक्ती सहजपणे आमच्याकडून होईल ..धन्यवाद आई.. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!!

 


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...