श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता… वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता… म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता… म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री महाराजांच्या काय मनात आले कुणास ठाऊक… श्री महाराज मुलांमध्ये बैसले आणि म्हणाले आम्हाला चिलीम हवी आहे कुणीतरी भरून द्यावी… हि महाराजांची वाणी होताच सर्व मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली… परंतु ती चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता होती… आता सर्वांनां प्रश्न पडला कि विस्तव कुठून आणावा… तितक्यात तिथे श्री बंकटलाल आले… बंकटलालानी मुलांना विचारले काय झाले… तेव्हा मुले म्हणाली… महाराजांना चिलीम भरुन दिली आहे परंतु ती पेटवण्यासाठी अग्नी नाही… तेव्हा बंकटलाल म्हणाले चिंता कशाला करता… आपल्या गल्लीत जानकीराम सोनार आहेत ना त्याच्या कडे जाऊन अग्नी घेऊन या… त्याच्या व्यवसायाची सुरवात अग्नी सुरु करूनच होते… ती मुले सोनाराकडे गेली… सोनाराला अग्नी मागितला… सोनार त्या मुलांना रागावला आणि म्हणाला अरे काय तुम्ही त्या महाराजांच्या नादी लागला आहात .. मी काही अग्नी वगैरे देणार नाही.. जाऊन सांग त्यांना जर आहात तुम्ही साक्षात्कारी तर मग विस्तवाची काय गरज आहे.. पेटवा तशीच चिलीम… सर्व मुले नाराज झाली… मुलांनी सर्व वृत्तांत महाराजांना व बंकटलाल यांना सांगितला… हे ऐकून महाराज हसले … बंकटलाल महाराजांना म्हणाला मी अग्नी तयार करतो… तेव्हा श्री महाराज म्हणाले… अग्नी तयार करू नकोस… नुसती काडी चिलीम जवळ धर… श्री महाराजांच्या आज्ञे नुसार बंकटलाल यांनी नुसती काडी चिलीम जवळ धरली तर चमत्कार झाला… चिलीम पेटली… काडी जशी तशी राहिली…सर्वांनी महाराजांची ती लीला पाहिली आणि एका स्वरात  सर्वांनी श्री गजानन महाराज कि जय असा जय जयकार केला.

बोध – श्री महाराज आम्हाला वरील लीलेतून बोध द्या… महाराजांनी वरील लीला केली तो दिवस होता… अक्षय तृतीया … खरंतर अक्षय तृतीया म्हणजे आपल्यातील चांगल्या गुणांना वाव देणे… चांगले गुण वाढवणे.. पुण्य कमवणे… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त होय… पण तो मुहूर्त जर आपल्या जीवनात बदल घडवत नसेल तर त्या दिवसाला मुहूर्त कसे म्हणणार… श्री महाराजांची इच्छा होती कि जानकीराम सोनार यांच्या जीवनात बदल घडवावा… पुण्य वृद्धी व्हावी… या साठी श्री महाराजांनी चिलीम ओढण्याची लीला केली… महाराजांच्या इच्छे नुसार सर्व मुले जानकीराम यांच्याकडे अग्नी मागण्यासाठी गेले परंतु… श्री जानकीराम यांची पुण्याई कमी पडली त्या मुळे त्यांनी अग्नी दिला नाही उलट त्यांनी महाराजांची टीका केली… या सर्व प्रकारा मुळे मुले नाराज झाले परंतु महाराजांनी अग्नी शिवाय चिलीम प्रज्वलित करून सर्वांना अनुभूती दिली.. खरंतर वरील लीलेतील जानकीराम हे आपल्या मध्ये सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात असतात पण आपण त्या कडे लक्ष देत नाही… आणि एक दिवस असा येतो कि जसे श्री जानकी राम यांना परब्रह्म कृपा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचे पूर्व संस्कार आड आले… असेच आपल्या जीवनात देखील होत असते… या ठिकाणी अग्नी म्हणजे आपल्यातील असणारी शक्ती जागृतीचे एक प्रतीक आहे.. जसा दिवा लावण्यासाठी अग्नी हवा असतो तसे आपल्या जीवनात महाराजांची कृपा होण्यासाठी आपणस आपल्यातील अवगुणांवर काम करून त्यावर मात करायची आहे… जेणेकरून श्री महाराज आपल्या जीवनात जो प्रकाश निर्माण करू इच्छितात त्या साठी मार्ग मोकळा होईल . चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आजच्या लीलेला माध्यम करून आपण आम्हाला खरी अक्षय तृतीया काय असते याची समज दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आपण अनेकदा आमच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात.. परंतु आमचे मन या मध्ये बाधा निर्माण करते…आमचे मन जानकीराम यांच्याप्रमाणे कृती करते… आम्हाला त्या मुलानं प्रमाणे बनव… जसे ती मुले तुमच्या आज्ञे प्रमाणे कृती करण्यास तयार झाली… त्या प्रमाणे आमचे मन बनव… जेणेकरून तू जे काही मला देऊ इच्छितोस त्यात माझे मन बाधा निर्माण करणार नाही.. धन्यवाद आई… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… श्री गजानन महाराज कि जय ।।


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...