जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 4, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच

श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते… श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी मिळाली होती… श्री विठोबा घाटोळ हे महाराजांची सेवा करत होते परंतु अंतर्मनात वेगेळेच विचार सुरु होते… मनात अहंकार… खोटी भक्ती … लालसा होती … महाराजांची सेवा थोडीच करत परुंतु दिखाऊ पण जास्त करत.. तो सर्वाना सांगत असे कि समर्थांच्या सेवेचे काम माझ्याशिवाय होत नाही… महाराज माझा शब्द कधीच टाळत नाहीत… इतर भक्तांवर तो हुकूम गाजवण्याचे काम करत असे… हे सर्व महाराजांना माहित होते परंतु महाराज त्या कडे दुर्लक्ष करत… एके दिवशी काही बाहेरगावची मंडळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती… परंतु त्यावेळी महाराज आराम करत होते… महाराजांना उठवण्याची कुणाची हिम्मत नव्हती.. सर्वांना प्रश्न पडला कि महाराजांना कुणीत उठवावे… त्यावेळी अनेकांनी श्री विठोबा घाटोळ यांचे नाव सुचवले… त्या बाहेरगाव वरून आलेल्या भक्तांनी श्री विठोबा घाटोळ यांना विनंती केली…आणि त्यांची विनंती व स्तुति ऐकून ते भारावून गेले… अहंकार जागृत झाला…आणि ते श्री महाराजांकडे गेले…श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली व आपण त्या लोकांना दर्शन द्यावे अशी विंनती केली… महाराजांकडे एक काठी होती ती घेऊ ते बाहेर आले… आलेल्या भक्तांना दर्शन दिले… दर्शन घेऊन बाहेरगांव वरून आलेले भक्त निघून गेले… ते भक्त निघून जाताच श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांस तिथे उपस्थित लोकांसमोर काठीने बदडून काढले… महाराजांचा मर खाल्ल्या नंतर श्री विठोबा तिथून पळून गेला तो परत काही श्री महाराजांकडे आला नाही … बोला श्री गजानन महाराज कि जय !! 

बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध -खरंतर वरील लीला म्हणजे आपल्या साठी डोळ्यातील अंजन आहे म्हणावे लागेल… पहा श्री विठोबा घाटोळ यांची पूर्वपुण्याई होती म्हणूनच त्यांना श्री महाराजांचा सहवास व सेवा करण्याचे भाग्य लाभले… परंतु त्यांच्यातील अहंकार व लोभी वृत्ती मूळे त्यांना त्या सेवेचा लाभ घेता आला नाही व परब्रम्हाच्या सेवेस ते मुकले… इथे आपणस हा सुद्धा बोध होतो पहा ना श्री महाराज आराम करत होते तरीही जे भक्त त्यांच्या दर्शन साठी आले होते… त्याची श्री महाराजांवर इतकी श्रद्धा होती कि श्री महाराज त्यांना दर्शन देण्यासाठी तात्काळ आले… इथे श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांना काठीने मारले… खरे तर महाराजांचा मार हा आपल्यातील चुकीच्या वृत्ती काढून टाकण्यासाठी असतो… आहे हे श्री विठोबा घाटोळ यांना समजले नाही…जसे हे त्यांना समजले नाही तसेच अनेकदा आपल्याही बाबतीत होत असते… अनेकदा आपल्याकडून जेव्हा काहीचुका होतात तेव्हा श्री महाराज इतरांना माध्यम बनवून आपल्याला मार वा समज देत असतात … कारण महाराजांना आपल्यातील चुकीच्या समजुती… आपल्यातील दिखाऊपणा घालवून आपल्यातील भक्ती वाढवायची आहे… परंतु नेमके आपण सुद्धा अनेकदा या गोष्टीला विरोध करतो आणि श्री विठोबा घाटोळ यांच्या प्रमाणे सेवा सोडून इतरत्र अडकतो… आपणस यावर स्व चिंतन… करण्याची नितांत गरज आहे… चला तर मग आपण त्या साठी श्री महाराजांना प्रार्थना करूया ..
प्रार्थना – श्री गजानन महाराज आमची देखील पुण्याई म्हणून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे… अनेकदा तू माझी प्रगती व्हावी यासाठी… इतरांच्या मार्फत शब्दरुपी काठी द्वारे व अन्य मार्गाने तू आमच्यातील… ढोंगीपणा… दिखाऊपणा… जावा यासाठी मला मदत करत असतेस परंतु माझ्यातील अहंकारी मन याला विरोध करते… आई माझी इतकीच प्रार्थना आहे कि माझ्या मनाने कितीही विरोध करू दे परंतु तू मला सॊडू नकोस कारण माझे भले कश्यात आहे हे मला समजत नाही… धन्यवाद आई… कोटी कोटी धन्यवाद

 

 


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...