भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

Nov 28, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा – नामाचा महिमा अगाध आहे… खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून श्रीलंकेत जायचे होते… जाण्यासाठी मार्ग होता समुद्र मार्ग… इतके अंतर जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता..आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला… मग वानर सेनेनं समुदात दगडे टाकण्यास सुरवात केली… परंतु किती दगडे टाकली तरी ती सर्व पाण्यात जाऊन खाली बसत होती… आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला.. तितक्यात पवन पुत्र श्री हनुमान यांच्या ह्रद्यातून विचार आला कि आपण दगडावर “श्री राम” लिहून दगड पाण्यात टाकावा.. असा विचार करून त्यांनी दगड पाण्यात टाकला असता तो दगड पाण्यावर तरंगू लागला.. हे पाहून सर्व वानर सेनेने… “श्री राम” हा मंत्र लिहून पाण्यात दगडे टाकण्यास सुरवात केली… ती सर्व दगडे पाण्यावर तरंगू लागली.. रस्ता तयार होऊ लागला… हे सर्व पाहून प्रभू श्री रामचंद्राना देखील वाटले आपण सुद्धा श्री राम लिहून दगड पाण्यात टाकावा… त्यानी सुद्धा पाण्यात दगड टाकला.. पण तो दगड पाण्यात बुडला… हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.. तेव्हा पवन पुत्र हनुमान म्हणाले… स्वामी आपण टाकलेले दगड नाही तरणांर कारण… आपण ज्याला धरता तो भवसागर पार होतो.. पण आपण ज्याला सोडता तो हा भावसागर तरु शकत नाही … म्हणजेच ज्याच्या मुखात नाम आहे तो या भवसागरात तरतोच… अश्या रीतीने राम नामाने श्री राम सेतूची निर्मिती झाली… तश्याच सेतू ची निर्मिती आपल्या जीवनात होईल जेव्हा आपण नाम रुपी साधना सातत्याने करू … हा आहे नाम महिमा.

चला तर मग आपण पवनसूत हनुमंतालाच प्रार्थना करूया… हे पवनसुता… आपली श्री राम नामावर इतकी श्रद्धा होती कि… आपण राम नामाचा मार्ग रुपी सेतू निर्माण केलात.. ज्या प्रमाणे आपल्या मुखात अखंड राम नाम होते… त्या प्रमाणे आमच्या मुखात भगवंताचे नाम यावे… नाम महिमा आम्हाला समजावा.. आमच्या ह्रद्यातून नामच यावे… आणि हृदयातील भगवंताची आम्हला ओळख व्हावी… हे पवन सुता हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...