श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

Nov 28, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते… आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले … त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की तुम्हाला गरज वाटत असेल तर मालिनी यांच्या घरातून झुणका आणि भाकरी घेऊन या असे महाराजांनी सांगितल्यावर पितांबर झुणका भाकर घेऊन आला ती झुणका भाकरी महाराजांनी खाल्ली आणि पितांबरला ते म्हणाले की हा मटका घेऊन जा आणि त्या नदीतून पाणी घेऊन ये.. तर पितांबर त्यांना म्हणाला की महाराज तेथे पाणी खूप कमी आहे आणि त्या पाण्यातून खूप वास येत आहे तुमची परवानगी असेल तर मी दुसऱ्या ठिकाणावरून चांगले म्हणजे शुद्ध पाणी घेऊन येतो त्यावर श्री महाराज म्हणाले की त्या ठिकाणावरूनच पाणी आण आणि पाणी हाताने नको भरू मटक्यानेच पाणी भर त्यानंतर श्री महाराजांची आज्ञा अनुसरून पितांबर  तेथे गेले.. तेथे गेल्यानंतर त्यांनी बघितले की पाणी तर हाथानेच भरण्यासारखे आहे पण महाराजांची आज्ञा होती म्हणून त्या अनुसार त्यांनी मटका पाणी भरण्यासाठी नदी मध्ये बुडवला त्यावेळी चमत्कार झाला मटका तर भरला पण त्या ठिकाणी त्या नदीमध्ये भरपूर पाणी आले आणि ते पाणी पण खूप शुद्ध होते की त्या मध्ये आपला चेहरा दिसेल हे सर्व पाहून पितांबर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्री गजानन महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज यांचा जयजयकार असो.

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध

वरील लीलेच्या माध्यमातून आपणास श्री महाराज अनेक बोध देत आहे तसे पहिला गेले तर प्रत्येक लिलेचा  बोध वेगळा असेलच परंतु श्री  महाराज आपल्याला वेगवेगळा बोध देतात येथे श्री महाराज यांना बंकटलाल आणि पितांबर यांनी विचारले की तुमच्या साठी जेवण घेऊन येऊ का ?तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन…  येथे महाराज सांगतात की तुम्ही ज्या देवाची सेवा करतात ती कशासाठी ?तर ती तुमच्यासाठी परंतु आपण म्हणतो की मी देवाची सेवा केली आणि हीच चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून श्री महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन म्हणजेच देवाची ची सेवा करा श्री महाराज यांनी सांगितले की झुणका भाकरी घेऊन या पहा येथे श्री महाराज आपल्यला सांगतात की भाकरीच्या पिठासारखे मऊ आणि चटणी सारखे कणखर बना तरच आपले जीवन आनंदमय होईल.. येथे पितांबर च्या कृतीतून आपल्याला कळते की गुरूच्या आज्ञेचे पालन कश्या प्रकारे केले पाहिजे मनात कोणत्याही प्रकारे शंका न घेता गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याच श्रद्धेचे फळ म्हणजे त्यांना स्वच्छ म्हणजे शुद्ध पाणी प्राप्त झाले ह्याच्यावर आपण मनन  चिंतन करू या

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...