श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

Nov 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

उगाचि भितोसी भय हे पळू दे – आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते… उद्या काय होईल… माझे अमुक काम होईल कि नाही… आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते… उद्या काय होईल याची… कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार डोकावतात… या मनाला विचारांना आपणस सांगायचे आहे… अरे भिऊ नकोस ब्रम्हांड नायक आपल्या सोबत आहेत!

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे – अरे मना तुझ्या जवळ अफाट अशी शक्ती आहे… स्वामी नामाची शक्ती… ती शक्ती आहे आहे आपल्या अंतकरणात आहे… आपल्या आतील आवाज अनेकदा आपणस सांगत असतो स्वामी महाराज आहेत भिऊ नकोस.. पण आपले नकरात्मक विचार मध्ये येत असतात… आपणास आंतरिक शक्तीस जागृत करायचे आहे… त्या शक्ती ची अनुभूती घ्यायची आहे.

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा – या संपूर्ण जीव सृष्टी च्या जन्म व मृत्यूची जी दोरी आहे ती… स्वामी महाराजांच्या हाती आहे… कुणाचा जन्म कधी होईल… शेवटचा श्वास कधी याचे संपूर्ण नियोजन हे स्वामी महाराजांच्या कडे आहे… थोडक्यात झाडाचं पण सुद्धा ज्यांच्या सत्ते ने हालते… अश्या ब्रम्हांड नायकाचे आपणस सेवक आहोत… एकदा का स्वामींच्या हाती आपला हात समर्पित केला कि मग.. प्रत्येक दिवस कसा स्वामीमय बनतो… पण याचा अर्थ असा मुळीच नाही कि आपले दुखत आहे आणि आपण म्हणाल मी काहीच करणार नाही… आपणास डॉक्टर कडे जावे लागेल.. त्याच्या नियमांचे पालन करावेच लागेल.

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा – हे मना तू घाबरू नकोस… तू स्वामीचा बाळ आहेस… जसे आपले आई वडील आपली काळजी घेतात तसेच स्वामी महाराज आपली काळजी घेत असतात… बघा एखादे लहान मुलं.. आपल्या आई च्या किंवा वडिलांच्या खांद्यावर बसते तेवहा त्यास खात्री असते… आपणस आपले वडील पडू देणार नाहीत… त्या मुले त्याच्या मनात कोणतीही भय नसते… ते घाबरत नाही… तशीच दृढ श्रद्धा आणि विश्वास आपणस आपल्यात निर्माण करायचा आहे… आपण स्वामींचे बाळ आहोत हा दृढ विश्वास आपणस आपल्या अंतकरणात निर्माण दृढ करायचा आहे.

 


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...