श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

Sep 19, 2021 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र त्यांच्या कडून करून घेतला..ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात उतरवला त्यांचे उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही..उलट त्यांना प्रार्थना करू या ..आमच्या अल्प बुद्धी ला त्याचा अर्थ उलगडू द्या..जशी भक्ती.. सेवा तुमच्या मार्फत झाली त्यातील काही तर सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी..आणि आमचे जीवन स्वामीं मय बनावे हीच प्रार्थना!
निःशंक हो निर्भय हो मन रे !
सुरवातीलाच स्वामीं आपल्या मनाला सांगत आहेत…हे मना..मनात कोणतीही शंका आणू नकोस..कोणतीच भीती मनात ठेवू नकोस…पहा सुरवातीलाच स्वामीं सांगत आहेत आपल्या स्वतःच्या मनावर कार्य करण्यास..कारण आपले मन हे सर्व गोष्टीचे कारक आहे..आपण मनात शंका उपस्थित केली की..आपले होणारे काम ही होत नाही..आपण मनाला सांगायच आहे..हे मना कोणतीच शंका भीती मनात आणू नकोस मनाला सांगायचं आहे..तू जी नकारात्मक बडबड करत आहेस..त्यापेक्षा स्वामीं नाम घे..मना एक गोष्ट लक्षात ठेव सर्व नकारात्मक विचारावर जे राम बाण औषध मला मिळालं आहे..ते म्हणजे “श्री स्वामीं समर्थ” हे नाम अंतर्मनात इतके रुजवा की आपले मन पण म्हणेल..अभी सिर्फ और सिर्फ श्री स्वामी समर्थ”
प्रचंड स्वामीं बळ पाठीशी रे- इथे स्वामीं महाराज आपल्या मनाला सांगण्यास सांगत आहेत ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती माझ्या पाठीशी आहे..आता इथे आपले मन शंका कुशंका निर्माण करते स्वामीं बळ पाठीशी आहे तरी पण आपले मन आपल्या मनात शंका निर्माण करते..या शंकेचे रूपांतर ..नकारात्मकते मध्ये होते..आणि आपल्यासोबत असणारी स्वामीं ची शक्ती जी कार्य करणार होती तिला अडथळा निर्माण होतो..आज आपण हाथ धुतो.. मास्क लावतो का ? कारण आपल्या मनावर हे खोल पर्यंत रुजले आहे की यानी आपण होणाऱ्या रोगाचा अटकाव करू शकतो अगदी तसेच नकारात्मक विचारांना हे माहीत आहे जर आपल्या मनावर नकारात्मक गोष्टी निर्माण झाल्या तर हा नक्कीच यांच्या पासून स्वामीं ची शक्ती बळ यांना प्राप्त होणार आहे यात अडथळा निर्माण होणार आहे..म्हणून मनाला सतत सांगा स्वामीं महाराजांची शक्ती माझ्या सतत सोबत आहे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी…स्वामीं महाराज हे आपल्या सामान्य बुद्धी च्या पली कडे आहेत
.याचे आपणस सतत स्मरण ठेवायचे आहे..काय होतं आपल्या मनात स्वामीं विषयी एक विशिष्ट अशी कल्पना रुपी आकृती तयार आहे..आणि त्यानुसार आपण विचार करतो व मन ही यालाच सत्य मानते…आता आपण म्हणाल की मग आम्ही जी मूर्ती ..फोटो पाहतो ते स्वामीं नाहीत का ? असे नाही ते स्वामीच आहेत.. पण फक्त तसेच स्वामींचे स्वरूप जाणतो..पण स्वामीं हे चरा चरात आहेत..पण आपल्या मनावर आपण आज पर्यंत जे काही संस्कार केले आहेत..करत आहोत त्यामुळे… आपण त्यांना ओळखू शकत नाही…त्यामुळं स्वामीं या ठिकाणी सांगत आहेत..की मी सतत तुझ्या सोबत आहे पण तू कोणतेही तर्क.. वितर्क लावत बसू नकोस..कारण तू त्यातच अडकशील.
अशक्य ही शक्य करतील स्वामीं..हा तर आपल्या सर्वांसाठी स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे..जर हा आशिर्वाद रुपी मंत्र आपल्या अंतर्मनात कोरला गेला तर या सारखा सुवर्ण योग असूच शकत नाही..कारण ही खूपच उच्चतम स्वामीं कृपा असेल कारण कोणत्याही परिस्थिती मध्ये ह्रदयातून एकच हाक येईल…अशक्य ही शक्य करतील स्वामीं त्याच क्षणी आपली इच्छा पूर्ण झालेली असेल.


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...