स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये प्रत्येकाचा वाटा हा महत्वपूर्ण आहे.. जर खरंच वेळ नसेल तर किमान १ वेळेस स्वामी नाम घ्या १ वेळेस तारक मंत्र म्हणा आणि ती सेवा लिंक वर पाठवा.. आपण किती सेवा करता या पेक्षा महत्वाचे सेवा करणे.. आणि सेवेत सातत्य येणे महत्वाचे आहे… आपणस फक्त नाम सेवा करण्याची इथे विनंती करत आहोत.. कारण स्वामी नाम मुखात येण्यासाठी सुद्धा… स्वामीं आईची कृपा लागते.. ती कृपा आपल्या सर्वांवर आहे.. पण आपले मन कारणे देत आहे.. थोडे मनावर कार्य करा.. मन नाही म्हणेल तरी किमान रोज एक वेळेस तरी स्वामी नाम घ्या…लवकरच स्वामी १ माळ जप सेवा करून घेतील.. आणी एक दिवस येईल कि रोजची ११ माळी , २१ माळी , ५१ माळी सेवा होईल.. फक्त गरज आहे.. आपल्या मनावर विजय प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.. चला तर मग ज्यांनी अजून सेवा सुरु केली नाही.. त्यांनी आज , या क्षणापासून सुरवात करावी हि विनंती..स्वामींना प्रार्थना करा.. स्वामी राया सेवा करून घे.. कारण तुझे नाम मुखात येण्यासाठी..तुझी कृपाच आवश्यक आहे.. समर्था कृपा कर..आमच्या प्रत्येकाकडून स्वामी नाम सेवा करून घे.. समर्था कृपा कर.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद..!!

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५)

कलियुगी दिवसेंदिवस ।
वाढेल स्वामी महिमा विशेष ।
ऐसे बोलले स्वामीदास ।
येथे विश्वास धरावा ॥

– स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज एक ओवी आपणस येईल..त्यावर चिंतन मनन करा पहा..अनेक प्रश्नांची उत्तरे स्वामीं आपणस देतात..!
वरील ओवीत स्वामीं आपणस विश्वास हा गुण आपल्यात वाढवण्यास सांगत आहेत.. विश्वास कसा असावा..लहान बालकाचा आपल्या आई वडिलांवर विश्वास असतो..काही झाले तरी आपले आई बाबा आहेत..या विश्वासात कुठेही शंका..अविश्वास नसतो..असतो १०० % विश्वास..स्वामीं सेवेतही.. आपला विश्वास कसा आहे त्या नुसार आपणस फळ मिळते…इथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात असावी..विश्वास व आपण करत असणारे कर्म हे प्रामाणिक।असावेत..म्हणजेच आपले कर्म हे स्वामींच्या विश्वासास पात्र असेच असावे..म्हणजेच स्वामीं आपणस आज विश्वास हा गुण वाढवण्यास सांगत आहेत..समर्था आमच्यातील विश्वास हा गुण वाढव..धन्यवाद समर्था..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..!

 

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७)

कर्ता आणि करविता ।
तूचि एक स्वामीनाथा ।
माझिया ठाई वार्ता ।
मीपणाची नसेची ॥
– स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५०
www.SwamiVaani.com

वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात असणारा गुण आहे.. प्रत्येक गोष्टीत आपण आपले कर्ते पण दाखवत असतो.. मी हे काम केले म्हणून झाले.. मी स्वामींची सेवा करतो.. म्हणजेच आपल्यातील मी नेहमी जागृत असतो.. पण खरंच आज या वर आपण आपणस प्रश्न विचारायचा आहे कि खरंच मीच कर्ता आहे का? अहो झाडाचे पान देखील त्याच्या इच्छे शिवाय हालत नाही.. त्याची इच्छा नसेल तर आपल्या मुखात स्वामी नाम येत नाही..मग खरंच आपण कर्ता आहोत का ? जर खरंच आपण यावर चिंतन मनन केले तर आपणस उत्तर मिळेल कि नाही मी कर्ता नाही.. माझ्या मार्फत कार्य करणारी शक्ती आहे.. पण आपले मन मी पणा सोडत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मीच कर्ता आहे असे मला वाटते.. हे समर्था तूच कर्ता आहेस .. आमच्या मार्फत तूच प्रत्येक कार्य करवून घेतोस.. हि समज आम्हाला प्राप्त होत आहे त्याबद्दल धन्यवाद.. हि समज कायम असू दे हीच प्रार्थना.. जे काही कार्य तू माझ्याकडून करवून घेत आहेस.. त्यात माझ्या अंगी मी पणाचा अहंकार येऊ देऊ नकोस.. कारण आज मला समजले आहे जो पर्यंत तुझी इच्छा होत नाही तो पर्यंत कोणतेच कार्य होत नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… !!

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर…देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म आहेत..म्हणजेच.. इथे स्वामीं आपणस तुलनात्मक भक्ती न करण्याचा संदेश देत आहेत..आपले काय होते..ही देवता वेगळी..हा देव वेगळा…असे काही नाही..प्रत्येक देवात स्वामीं आहेत.. स्वामीं मध्ये प्रत्येक देव आहे.. म्हणजेच.. देवत्व एकच आहे.. आपणच त्याला विविध नावे देतो..कुणी स्वामीं म्हणेल..कुणी दत्त म्हणेल..कुणी विष्णू म्हणेल..स्वामीच आहेत सर्वत्र..फक्त या ठिकाणी आपली समज कशी आहे..यावर सर्व अवलंबून आहे..म्हणजेच स्वामीं इथे आपणस स्वामीं तुलनात्मक भक्ती न करण्याचा संदेश देत आहेत…कारण तुलना आली की भक्ती मध्ये भाव उतरणार नाही..भाव नसेल तर भक्ती कशी होणार.. हे समर्था आमच्यातील तुलनात्मक भक्ती दूर कर..सर्वत्र तूच आहेस ही समज दे..तुझ्या नामात दंग कर..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी
१)वेळ नाही
२) खूप काम
३)कंटाळा
४)आज इच्छा नाही
५) उद्या पासून करू
६) जप करताना झोप येते
अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी आपल्या हाकेला ओ दिली नाही तर ? असे होत नाही..होणार नाही.. पण आपण ही सेवेत कमी पडायचे नाही..वेळ मिळाला की स्वामीं नाम, मनात द्वंद्व निर्माण झाले की तारक मंत्र.. पहा…स्वामीं नाम,.स्वामी सेवा ही अनुभूती आहे….स्वामीं नाम।सेवेस काय लागते..आपल्या मनाची तयारी..चला तर मग सेवा रुजू करूया..! धन्यवाद स्वामीं