जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७)

आजचे चिंतन-मनन

सर्व शास्त्र हुनी थोर !!
असे माझा स्वामीराव !!
जिथे सर्व शास्त्र अपूर्ण !
तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि… आपणस लगेचच त्याचा विसर पडतो.. सर्व शास्त्रांहून थोर.. इथे आपली गल्लत होऊ शकते ती अशी कि आपण तुलना करत आहोत.. पण असे नाही.. प्रत्येक गोष्ट हि त्या ठिकाणी योग्य असते मग ते शास्त्र असो वा आणि काही.. सर्व शास्त्राची निर्मिती हि स्वामीच तर करतात… म्हणजेच इथे जर आपण विचार केला तर आपणस तुलना न करता स्वामींवर विश्वास दृढ करायचा आहे.. म्हणजेच क्षणिक गोष्टीत न अडकता स्वामी नामावर मनाला स्थिर कार्याचा आहे..जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! इथे आपल्यातील चुकीच्या मान्यतेवर प्रहार केला आहे.. पहा आपल्या जीवनात समस्या आहे.. समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण आध्यत्मिक सेवा करतो.. मग ती स्वामी सेवा असो वा आणखी काही.. पण स्वामी सेवा करतानाही आपण फक्त स्वामी सेवा करतो का नाही मग आपले मन म्हणते वा आणखी कुणी सांगते कि.. अमुक अमुक सेवा कर.. हे नाही ते कर… इथे एक गोष्ट परत सांगावीशी वाटते आपण कश्यावर टीका करत नाही आहोत पण जर आपली स्वामींवर श्रद्धा आहे.. विश्वास आहे मग का ? स्वामी सेवे व्यतिरिक्त आणखी सेवा करावी लागते.. का आपले मन अजूनही इतर सेवांकडे वळते.. का स्वामी नामावर स्थिर होत नाही.. कारण आपण स्वामींना आई म्हणून हाक मारत नाही.. आपली भक्ती अजून स्वामी चरणी दृढ नाही… आपणस हि भक्ती दृढ करायची आहे.. कोणतीही परिस्थिती येऊ मुखातून स्वामी नामच यावे.. म्हणजेच अंतर्मनात हा विचार कोरला गेला पाहिजे आता फक्त आणि फक्त स्वामी भक्ती.. स्वामी प्रेम..अशी स्वामी भक्ती प्रेम आपल्या जीवनात यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना.. धन्यवाद समर्था.. !!

 

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’ ..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

स्वामी वाणी पुष्प ५३२(पर्व ४ थे भाग ३६)

आजचे चिंतन-मनन

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘नशीब’
..जे भेटते ‘पुण्याईने’ !!
श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’
..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

www.SwamiVaani.com

 

अहंकार नसावा मनी !

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४)

आजचे चिंतन-मनन

अहंकार नसावा मनी !
समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !!
कर्ता करविता एकच समर्थ स्वामी !
ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !!

www.SwamiVaani.com

वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे पुन्हा आपल्या मनावर प्रहार करण्यात आला आहे.. आपले मन नेहमी मी.. मी चा पाढा म्हणत असते.. मी देवाचे इतकी सेवा करतो.. मी कुटुंबासाठी इतके करतो.. मी चा अहंकार आपल्या जीवनात इतका असतो कि.. आपणस असे वाटते कि मी करतो म्हणूनच होत आहे.. पण खरंच विचार करा आपण नव्हतो तेव्हा हि सर्व सुरु होते… मी नसेल तेव्हा हि सर्व सुरु असणारच आहे.. मग माझ्यातील मी काम करतो कि.. माझ्या द्वारे काम करून घेणारी दुसरी शक्ती आहे.. नक्कीच यावर चिंतन मनन कर.. म्हणजेच इथे स्वामी आपल्या तील अहंकारावर मात करण्यास सांगत आहेत.. अहंकार कमी झाला कि आपण जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित करा… जसे आज दिवसभर जे काम केले असेल.. स्वामी सेवा केली असेल ती सर्व स्वामींना अर्पण करा.. स्वामी ना म्हणावे धन्यवाद माझ्याकडून सेवा करून घेतलीस.. म्हणजेच इथे समर्पित भाव आपणस जागृत करायचा आहे… सर्व काही स्वामींच्या इच्छेने होत आहे.. स्वामीच कर्ता आहेत मी फक्त निमित्त आहे… हा विश्वास आपणस आपल्यात अंतर्मनात जागृत करायचा आहे.. चला मग आज आपल्यातील अहंकारावर काम करूया .. धन्यवाद समर्था .. !

 

काळजी नको करू मित्रा

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३)

आजचे चिंतन-मनन

काळजी नको करू मित्रा,
स्वामी तुझ्या पाठीशी आहे..!
ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास,
आता नशीब तुझ्या सोबत आहे..!!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला मित्राची उपमा दिली आहे..कारण आपल्या मना सारखा आपला दुसरा चांगला…खरा..मित्र दुसरा कोणी नाही..पण आपण मनाला मित्र बनवत नाही तर.. आपण।मनाचे गुलाम बनतो..मग मन आपणस नकारात्मक प्रतिसाद देते..आपणासही तेच खरे वाटते..त्या मुळे स्वामीं सांगत आहेत..मनाला मित्र बनव…मित्र झाले की..मनात विश्वास निर्माण होईल..स्वामीं पाठीशी आहेत..विश्वास ही स्वामीं सेवेतील खूप मोठी शक्ती आहे.. एकदा मन मित्र बनले..स्वामीं वर विश्वास दृढ झाला की..नशीब..ज्यावेळी वाईट होते तेव्हा आपण नशीब म्हणतो..पण नशीब हे दुसरे काही नसून आपल्यातील अविश्वास..आपल्यातील अविश्वास जाऊन विश्वास निर्माण झाला की..उरते ती फक्त स्वामीं ची साथ..चला तर मग मनावर काम करूया..स्वामीं नाम घेऊया.. धन्यवाद स्वामीं..!

स्वामी करणार नाही तुला उदास !!

स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२)

आजचे चिंतन-मनन

अरे किती सोसतोस त्रास !!
बन तू स्वामींचा दास !
विश्वासाने सांगतो ,
स्वामी करणार नाही तुला उदास !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास यावर..त्रास कोण करून घेते मन.. सर्व गोष्टी चे मुळ आहे..आपल्या मनातील विचार… कारण मन हे प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करून त्रास करून घेते..आपणस त्रास होतो वा आपण करून घेतो..अश्या ह्या मनाला आपणस जागेवर आणायचं.. मग काय करावे लागेल..त्याला काही तरी काम दयावे लागेल..काम कोणते..स्वामी भक्तीचे, स्वामीं नामाचे, स्वामीं चरित्र चिंतन मनन करण्याचे…याने काय होईल..त्याला नकारात्मक विचार करण्यास वेळ नाही मिळणार..मग याचा परिणाम काय होईल..मनात विश्वास निर्माण होईल..ह विश्वास.. स्वामी सेवेत असेल.. भक्तीत असेल..आपल्या दैनंदिन जीवनात असेल..मग फक्त उरेल..प्रेम.. आनंद…मौन.म्हणजेच स्वामींची अनुभूती.. चला तर मग मनाला..स्वामी सेवेला लावूया..धन्यवाद स्वामीं..!