श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल )

शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर कुकाजी यांना संतती नव्हती..वडील आणि काका यांच्या मृत्यू नंतर कडताजी यांचा मोठा मुलगा खंडु हा घरातील कारभारी झाला.. पाचही भावंडे त्याच्या आज्ञे नुसार कार्य करत होती.. गणपती, नारायण , मारुती ,हरी आणि कृष्णाजी अशी त्यांचे नावे ,या घराण्याला कुस्ती ची फार आवड होती तसेच आपल्यात असणाऱ्या बळाचा त्यांना फार गर्व होता.. गावातील सर्व लोक त्यांना घाबरत असत..खंडू यांचे भाऊ एकदा मारुतीच्या मंदिरात गेले तिथे श्री महाराज होते.. यांनी महाराजांना त्रास देण्यास सुरवात केली.. महाराजांना अपशब्द बोलत होती.. पण महाराज काहीच बोलले नाही..एके दिवशी हरी पाटील मारुतीच्या मंदिरात आला आणि श्री महाराजांना म्हणाला.. चला आपण माझ्याशी कुस्ती खेळा मी आपणस कुस्तीत चित करतो.. जर तुम्ही मला पाडले तर मी तुम्हाला बक्षीस देईल.. लोकांना हि कळेल कोण आहे सामर्थ्य वान..श्री महाराजांनी हसून होकार दिला आणि दोघे तालमीत गेले.. महाराज तालमीत गेल्यावर मध्यभागी बसून राहिले व हरीला म्हणाले.. जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) .. हरी पाटील ने खूप प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.. हरी ने मनातल्या मनात विचार केला नक्कीच हे कुणीतरी सामर्थ्यवान आहेत.. त्यामुळेच त्यांनी आज पर्यंत आपण इतका त्रास दिला तरी तो त्यांनी सहन केला.. हरी पाटील महाराजांच्या चरणी लीन झाला.. महाराज त्याला म्हणाले अरे शरीर , घरदार आणि संपत्ती याचा मान करावा गर्व नाही.. आता आम्हाला आमचे बक्षीस दे.. तुझ्याकडे जे काही त्याने सर्व गावाचे कल्याण कर.. हरी पाटलाला महाराजांचे म्हणणे पटले.. तो महाराजांचा शिष्य झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय… !

बोध – वरील लीलेतून बोध होतो कि आपल्या कडे जे काही आहे त्याचा गर्व करू नका तर त्याचा सदुपयोग करा.. कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते.. बोला श्री गजानन महाराज कि जय

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. !

शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये आले पण ते कधीच एकाच ठिकाणी राहिले नाही.. ते कायम इतर गावामध्ये जात असत.. शेगांव मध्ये मारुती च्या मंदिरात श्रावण महिन्यात मारुतीचा उत्सव खुप मोठा होत असे.. तेव्हा अनेक पाटील लोक यात सहभागी होत असत.. या ठिकाणी उत्सवाचे नियोजन खंडू पाटील यांच्याकडे होते..या मारुती मंदिरात गजानन महाराज आले.. त्याच्या सोबत बंकटलाल हि आले होते.. श्री महाराज बंकटलाल यांस म्हणाले मी आता मंदिरात राहणार आहे .. आम्ही संन्यासी आहोत आणि संन्यास्याने एकाच ठिकाणी वास्तव्य करणे योग्य नाही जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीलेत खूप खोल असा बोध आहे.. महाराज सर्वत्र आहेत.. अमुक एकाच ठिकाणी महाराज आहेत असे आहे का नाही.. जेव्हा आपण बंकटलाल यांच्या प्रमाणे ह्रद्यातून ईश्वराला हाक मारतो तेव्हा महाराज आपणस भेटतातच केवळ आपली भक्ती आणि विश्वास असावा.. ! बोला श्री गजानन महाराज कि जय

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस!

शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो सूर्य उपासक होता.. तो रोज न चुकता सूर्याला अर्घ्य देत असे.. एके दिवशी वज्रभूषण अर्घ्य देत असताना त्याला सूर्याच्या जागी श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले.. तेव्हा श्री महाराज तिथेच बसलेले होते..वज्रभूषण तात्काळ महाराजच्या चरणी लीन होतो.. महाराजांच्या चरणी अर्घ्य समर्पित करतो.. आरती करतो.. महाराजांची स्तुति करतो.. मला आज माझ्या सेवेचे फळ मिळाले.. आपल्या दर्शनाने माझ्या सर्व चिंतेचे हरण झाले आहे.. महाराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि उपदेश करतात कि कर्म मार्ग सोडू नकोस.. मात्र फळाच्या अपेक्षेत न अडकता अखंड कर्म करत रहा.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीलेतून श्री महाराज आपणस कर्म करण्याचा उपदेश करत आहेत.. कर्म करा पण विना फळाची अपेक्षा म्हणजेच कर्म तो पर्यंत करत रहा जो पर्यंत यश मिळत नाही.. !

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. !

शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे सुद्धा मोठे सत्पुरुष असणार.. श्री महाराज त्यांना भेटण्यासाठी अकोट गावात जातात.. दोघांची भेट होते.. श्री नरसिंग यांना विठ्ठल भक्ती प्रिय होती.. ते अरण्यात जाऊन साधना भक्ती करत परंतु ते सांसारिक होते.. महाराजांची व त्यांची अनेक विषयांवर बोलणे झाले.. महाराज त्यांना म्हणतात.. अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! कारण प्रपंच आणि परमार्थ यांची जो सांगड घालतो तोच भक्ती करू शकतो.. म्हरजेचे हे शब्द ऐकून श्री नरसिंग राव महाराजांना म्हणतात महाराज आपण मला भेटण्यासाठी इथे आलात मी धन्य झालो.. असेच आपले वारंवार दर्शन व्हावे हीच आपल्या चरणी प्रार्थना.. महाराज म्हणतात.. संतत्व मठात नाही..विद्वतेत नाही.. कवित्वात नाही तर स्वानुभवात आहे.. आणि याला मार्ग म्हणजे नामस्मरण करणे.. महाराज आल्याची बातमी आजू बाजूच्या गावात समजली अनेकजण आले पण तो पर्यंत महाराज तिथून निघुन गेले होते.. बोला श्री गजानन महाराज कि जय..!

बोध- वरील लीलेत अनेक बोध आहेत.. जसे महाराज आपणस प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्यास सांगत आहेत.. नामावर चित्त स्थिर करण्यास सांगत आहेत.. !

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6
श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते… गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक विहीर होती तिथे कणसे भाजण्याची तयारी करण्यात आली.. तिथेच एक कल्पवृक्ष होते त्या खाली महाराज बसले .. त्या झाडाला मधमाश्याचे पोळे होते.. हे कुणाच्याही लक्षात आले नाही.. तिथेच कणसे भाजण्यासाठी सुरवात केली.. कणसे भाजत असताना धूर व अग्नीची दाहकता याचा परिणाम असा झाला कि त्या झाडावरील मधमाश्या उठल्या व सर्वांना चावू लागल्या.. सर्व जण पळू लागले श्री महाराज मात्र जागेवरून उठले नाही..ते स्वस्वरूपात रममाण होते.. सर्व माश्या श्री महाराजांच्या अंगावर बसल्या होत्या.. जसे कि महाराजांनी माश्यांची शाल केली आहे.. हे सर्व पाहून श्री बंकटलाल यांचे हृद्य द्रवित झाले.. त्यांच्या मनात विचार आला कि उगाचच आपण श्री महाराजांना कणसे खाण्यासाठी इथे आणले.. आणि श्री बंकटलाल श्री महाराजांकडे जाऊ लागला.. त्या क्षणी श्री महाराजांनी त्या मध माशांना आपल्या जागी जाण्याची आज्ञा दिली.. ते म्हणाले अरे माझा खरा भक्त माझ्या साठी येत आहे.. त्याला त्रास देऊ नका तुम्ही आपल्या जागेवर जा.. महाराजांनी असे म्हणताच सर्व माश्या झाडावर जाऊन बसल्या.. श्री बंकटलाल यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.. ते महाराजांना म्हणाले.. मी सोनाराला घेऊन येतो काटे काढण्यासाठी.. बंकटलाल सोनाराला घेऊन येतात.. सोनार पहातो तर त्याला एकही काटा दिसत नाही… तेव्हा तेव्हा सोनार म्हणतो कि मला तर काटे दिसत नाहीत.. तेव्हा श्री महाराज म्हणाले काटे काढण्यासाठी चिमट्याची आवश्यकता नाही.. महाराजांनी काही क्षण श्वास रोखला व काही क्षणात सर्व काटे बाहेर आले.. महाराजांचे शरीर पूर्वी प्रमाणे झाले.. हे सर्व पाहून सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीला म्हणजे भक्ती कशी असावी हे सांगण्यासाठीच हि लीला आहे.. पहा ब्रम्हांड नायक कणीस खाण्यासाठी शेतात गेले.. खरे तर हे एक निमित्त होते परीक्षा पाहण्यासाठी..मधमाशी मध देते पण ते अदृश्य रूपाने देते.. कारण आपण मध तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा तिथे माशी नसेल.. म्हणजेच गुरुकृपा तेव्हाच होते जेव्हा संकट रुपी माशी दूर करू.. संकट रुपी माशी असतानाही जेव्हा आपण अखंड सेवा सुरु ठेवतो.. तेव्हा त्या सेवेचे फलित म्हणजे मधाप्रमाणे गोडवा होय.. जेव्हा आपण संकटाशी दोन हात करतो.. संकटात देखील आपली श्रद्धा ढळत नाही तेव्हा त्याचे फलस्वरूप गोडच असते.. वरील लीलेत कणसे खाण्यासाठी सर्व आली पण मध माश्या आल्यावर सर्वजण पळून गेली.. श्री बंकटलाल मात्र त्याही स्थिती मध्ये श्री महाराजांकडे जाण्यासाठी तयार होते.. त्याचे फलस्वरूप श्री महाराजांनी माश्याना आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा दिली.. श्री बंकटलाल यांची भक्ती फारच उच्चतम होती.. यातून हाही बोध आपणस मिळतो कि एखादा संकटात असेल तर त्याला मदत करा कारण आज आपण त्याला केलेली मदत हि देखील सेवेचा एक भाग आहे.. इथे कदाचित आपल्यात मनात येइल कि आर्थिक मदत का ? आर्थिक मदत असे नाही तर आपण इथे मानसिक मदत करू शकतो.. आत्म बळ वाढवू शकतो.. मदत हि अनेक प्रकारे होऊ शकते फक्त मदत करताना आपले तसेच समाजाचे तसेच ज्याला आपण मदत करत आहोत त्याचे नुकसान तर होत नाही ना याची देखील आपणस भान ठेवायचे आहे.. चला तर मग आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया –हे समर्था.. आजची तुझी लीला म्हणजे भक्तीचा पाठच म्हणावी लागेल.. आजच्या लीलेतून संकटकाळी सुद्धा कशी भक्ती करावी याची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद…जसे भक्ती भाव बंकटलाल यांच्या हृदयात प्रगट झाले.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव.. हे मध माश्यानो आज पर्यंत आम्हीं आपणस फक्त आपण चावता एवढेच लक्षात ठेवल.. पण मधाची मधुरता तुमच्या शिवाय शक्य नाही हि शिकवण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. कोणतेही संकट येवो.. आपल्यातील मधुरता आम्हाला आठवावी हीच समर्था प्रार्थना