स्वामीं भक्तहो…आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना…”श्री स्वामीं समर्थ” १०८ वेळेस म्हणा…पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत… फक्त स्वामीं नाम…पहा किती सोपे।आहे…अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच आहे…फक्त आपण करत नाही… स्वामीं नाम हे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे..करून पहा..! धन्यवाद स्वामीं
स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत
स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे लागेल..स्वामीं भक्ती सुद्धा अशीच आहे..आपली भक्तीची भुक तेव्हाच वाढेल जेव्हा आपण सेवा करू..सेवा म्हणजे स्वामीं नाम घेणे असेल..स्वामीं च्या लीला वाचून त्यातून स्वामीं काय सांगत आहेत यावर..चिंतन मनन करणे…हे रोज करावे लागेल…यात एक अडचण येते..आपले मन म्हणते..की या लीलेत अमुक व्यक्ती आहेत त्यांनी असे का केले..असे करायला नको होते..खरंतर त्यानी असे या साठी केले की..स्वामीं नी त्यांना बुद्धी दिली की ..पुढच्या पिढीने ही चूक करू नये..म्हणजेच प्रत्येक लीला ही आपली भक्ती वाढण्यासाठी आहे..पण आपण नको ते विचार करून आपले नुकसान करतो..असो आपणस आपली भक्ती वाढवण्यासाठी कार्य करायचे आहे…चला स्वामीं नाम+ चरित्र वाचन+श्रवण+चिंतन मनन करून भक्ती दृढ करूया…! धन्यवाद समर्था..!
आपणही चिंतन मनन करा..ते लिहून काढा..इतरांशी share करा
भक्ती आणि ज्ञान
स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ…आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत…आपण विधिवत पूजा करत आहोत…आपल्या मनातील भाव तपासून पहा…कुठे तरी अहंकार असणारच..कारण आपण हे सर्व ज्ञान अभ्यास करून मिळवले आहे..ते शुद्ध आहे पण आपले मन ते ग्रहण करू शकत नाही…आता दुसरा एक स्वामीं भक्त आहे..त्याला न कोणता मंत्र माहीत आहे न तंत्र माहीत आहे..पण त्याच्या ह्रदयात स्वामीं भक्ती रुजली आहे..स्वामीं नाम मुखात आहे..तो भोळा भाव धरून फक्त स्वामीं नाम घेत स्वामीं चा अभिषेक करत आहे…मनात कोणताच अहं नाही..आता आपणच विचार करा कुणाचा भक्ती भाव हा खोल असेल…नक्कीच ज्ञान हे भक्तीतून निर्माण झाले तर आपले कल्याण करते..पण केवळ ज्ञान आपले नुकसान करते..थोडक्यात आपणस तंत्र वा मंत्र यात न अडकता..स्वामीं नाम आणि भक्ती यावर कार्य करायचे आहे..इथे एक गोष्ट समजून घ्यावी प्रत्येक पद्धती ही त्या त्या काळा नुसार योग्य च होती..आहे पण आपणस व्यक्तिमत्व विकास करताना आपणस योग्य काय याचा विचार करून..स्वामीं भक्ती वाढवायची आहे…मनात कोणताही अहं न ठेवता..धन्यवाद स्वामीं..!
स्वामींची भक्ती
स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून समजून येईल.. पहा मला काहीतरी अडचण आहे जसे मला एखादी वस्तू हवी आहे.. मी स्वामींना म्हणतो.. स्वामी माझे अमुक अमुक काम करा मी तुम्हाला अमुक अमुक देईल.. पहा एकीकडे आपण म्हणतो कि स्वामी तुम्हीं मला द्या.. याचा अर्थ आपले अंतर्मन जाणते कि आपण हे करू शकत नाही या साठी स्वामी कृपा हवी… आता मला सांगा जर मला स्वामीच मला देणार आहेत.. जो देणारा आहे त्याला मी काय देणार..म्हणजेच आपण आपल्यातील भक्ती भाव सोडून व्यवहारिक पणा आणतो..आता आपण अशी प्रार्थना करू शकतो कि स्वामी आपण तर सर्व जाणताच.. तरीही मी प्रार्थना करत आहे.. माझे अमुक अमुक कार्य व्हावे हि प्रार्थना.. पहा इथे प्रार्थना आहे म्हणजे आपल्यातील भक्ती भाव वाढतो.. जर स्वामींना काही द्यायचे असेल तर आपल्यातील अवगुण स्वामी चरणी अर्पण करू.. कारण स्वामी कृपेने ते दूर होतील हा विश्वास आहे..धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद..!! आपणही चिंतन मनन करा.. प्रार्थना करा हि विनंती
अहंकार
हे समर्था… माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे… माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत संपत नाही..तो पर्यंत कोणतीच प्रगती होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..👍
www.chetnakeswar.com