श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो

हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले ) हे पाहून त्यांचे चारही बंधूना आश्चर्य वाटले.. त्यांनी हरी पाटील ला समजावून सांगितले तू जे करत आहे ते चुकीचे आहे.. आपण पाटील आहोत.. लोक आपले ऐकतात आणि आपण त्या महाराजांची सेवा करता.. हे चारही भाऊ उसाची मुळी घेऊन मंदिरात गेले आणि श्री महाराजांना म्हणतात.. ऊस खाणार का ? जर आपण ऊस खाणार असाल तर आमची एक अट आहे ती जर आपणस मान्य असेल तर आम्ही आपणस ऊस देतो.. आम्ही तुम्हाला उसाने मारणार जर तुमच्या अंगावर एकही वण उठला नाही तरच आम्ही आपणस योगी मानू.. महाराज काहीच बोलले नाही.. त्यातील एक भाऊ म्हणाला महाराज काही बोलत नाही म्हणजेच ते घाबरले आहेत असे मारुती म्हणाल.. तर दुसरा भाऊ गणपती म्हणतो अरे त्यांचे मौन आहे याचा अर्थ त्यांची संमती आहे..ते सर्व जण महाराजांना मारण्यासाठी आले.. हे सर्व पाहून बाकी सर्व सेवेकरी पळून गेली पण भास्कर पाटील मात्र तिथेच थांबले आणि त्या चौघांना सांगत होते.. अरे अशी चूक करू नका.. मात्र ते चौघे मात्र ऐकण्यास तयार नव्हते.. ते मारत होते महाराज मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते..त्यांनी इतके मारले मात्र महाराजांच्या शरीरावर एक हि वण नव्हता.. हे पाहून ते चौघे घाबरली आणि श्री महाराजांच्या चरणी लीन झाले.. महाराज त्यांना म्हणतात बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो.. श्री महाराजांनी हाताने उसाचा रस काढला न कोणता चरका होता न काही यंत्र.. हे पाहून त्या चारही भावांना महाराजांच्या योग सामर्थ्यचि अनुभूती आली.. अश्या प्रकारे पाटील बंधू श्री महाराजांचे सेवक ( भक्त) झाले .. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – श्री महाराज आपली चुकी माफ करतात फक्त आपणस महाराजांना ह्रदयपूर्वक समर्पित व्हायचे आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल )

शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर कुकाजी यांना संतती नव्हती..वडील आणि काका यांच्या मृत्यू नंतर कडताजी यांचा मोठा मुलगा खंडु हा घरातील कारभारी झाला.. पाचही भावंडे त्याच्या आज्ञे नुसार कार्य करत होती.. गणपती, नारायण , मारुती ,हरी आणि कृष्णाजी अशी त्यांचे नावे ,या घराण्याला कुस्ती ची फार आवड होती तसेच आपल्यात असणाऱ्या बळाचा त्यांना फार गर्व होता.. गावातील सर्व लोक त्यांना घाबरत असत..खंडू यांचे भाऊ एकदा मारुतीच्या मंदिरात गेले तिथे श्री महाराज होते.. यांनी महाराजांना त्रास देण्यास सुरवात केली.. महाराजांना अपशब्द बोलत होती.. पण महाराज काहीच बोलले नाही..एके दिवशी हरी पाटील मारुतीच्या मंदिरात आला आणि श्री महाराजांना म्हणाला.. चला आपण माझ्याशी कुस्ती खेळा मी आपणस कुस्तीत चित करतो.. जर तुम्ही मला पाडले तर मी तुम्हाला बक्षीस देईल.. लोकांना हि कळेल कोण आहे सामर्थ्य वान..श्री महाराजांनी हसून होकार दिला आणि दोघे तालमीत गेले.. महाराज तालमीत गेल्यावर मध्यभागी बसून राहिले व हरीला म्हणाले.. जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) .. हरी पाटील ने खूप प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.. हरी ने मनातल्या मनात विचार केला नक्कीच हे कुणीतरी सामर्थ्यवान आहेत.. त्यामुळेच त्यांनी आज पर्यंत आपण इतका त्रास दिला तरी तो त्यांनी सहन केला.. हरी पाटील महाराजांच्या चरणी लीन झाला.. महाराज त्याला म्हणाले अरे शरीर , घरदार आणि संपत्ती याचा मान करावा गर्व नाही.. आता आम्हाला आमचे बक्षीस दे.. तुझ्याकडे जे काही त्याने सर्व गावाचे कल्याण कर.. हरी पाटलाला महाराजांचे म्हणणे पटले.. तो महाराजांचा शिष्य झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय… !

बोध – वरील लीलेतून बोध होतो कि आपल्या कडे जे काही आहे त्याचा गर्व करू नका तर त्याचा सदुपयोग करा.. कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते.. बोला श्री गजानन महाराज कि जय

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. !

शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये आले पण ते कधीच एकाच ठिकाणी राहिले नाही.. ते कायम इतर गावामध्ये जात असत.. शेगांव मध्ये मारुती च्या मंदिरात श्रावण महिन्यात मारुतीचा उत्सव खुप मोठा होत असे.. तेव्हा अनेक पाटील लोक यात सहभागी होत असत.. या ठिकाणी उत्सवाचे नियोजन खंडू पाटील यांच्याकडे होते..या मारुती मंदिरात गजानन महाराज आले.. त्याच्या सोबत बंकटलाल हि आले होते.. श्री महाराज बंकटलाल यांस म्हणाले मी आता मंदिरात राहणार आहे .. आम्ही संन्यासी आहोत आणि संन्यास्याने एकाच ठिकाणी वास्तव्य करणे योग्य नाही जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीलेत खूप खोल असा बोध आहे.. महाराज सर्वत्र आहेत.. अमुक एकाच ठिकाणी महाराज आहेत असे आहे का नाही.. जेव्हा आपण बंकटलाल यांच्या प्रमाणे ह्रद्यातून ईश्वराला हाक मारतो तेव्हा महाराज आपणस भेटतातच केवळ आपली भक्ती आणि विश्वास असावा.. ! बोला श्री गजानन महाराज कि जय

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस!

शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो सूर्य उपासक होता.. तो रोज न चुकता सूर्याला अर्घ्य देत असे.. एके दिवशी वज्रभूषण अर्घ्य देत असताना त्याला सूर्याच्या जागी श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले.. तेव्हा श्री महाराज तिथेच बसलेले होते..वज्रभूषण तात्काळ महाराजच्या चरणी लीन होतो.. महाराजांच्या चरणी अर्घ्य समर्पित करतो.. आरती करतो.. महाराजांची स्तुति करतो.. मला आज माझ्या सेवेचे फळ मिळाले.. आपल्या दर्शनाने माझ्या सर्व चिंतेचे हरण झाले आहे.. महाराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि उपदेश करतात कि कर्म मार्ग सोडू नकोस.. मात्र फळाच्या अपेक्षेत न अडकता अखंड कर्म करत रहा.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीलेतून श्री महाराज आपणस कर्म करण्याचा उपदेश करत आहेत.. कर्म करा पण विना फळाची अपेक्षा म्हणजेच कर्म तो पर्यंत करत रहा जो पर्यंत यश मिळत नाही.. !

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. !

शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे सुद्धा मोठे सत्पुरुष असणार.. श्री महाराज त्यांना भेटण्यासाठी अकोट गावात जातात.. दोघांची भेट होते.. श्री नरसिंग यांना विठ्ठल भक्ती प्रिय होती.. ते अरण्यात जाऊन साधना भक्ती करत परंतु ते सांसारिक होते.. महाराजांची व त्यांची अनेक विषयांवर बोलणे झाले.. महाराज त्यांना म्हणतात.. अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! कारण प्रपंच आणि परमार्थ यांची जो सांगड घालतो तोच भक्ती करू शकतो.. म्हरजेचे हे शब्द ऐकून श्री नरसिंग राव महाराजांना म्हणतात महाराज आपण मला भेटण्यासाठी इथे आलात मी धन्य झालो.. असेच आपले वारंवार दर्शन व्हावे हीच आपल्या चरणी प्रार्थना.. महाराज म्हणतात.. संतत्व मठात नाही..विद्वतेत नाही.. कवित्वात नाही तर स्वानुभवात आहे.. आणि याला मार्ग म्हणजे नामस्मरण करणे.. महाराज आल्याची बातमी आजू बाजूच्या गावात समजली अनेकजण आले पण तो पर्यंत महाराज तिथून निघुन गेले होते.. बोला श्री गजानन महाराज कि जय..!

बोध- वरील लीलेत अनेक बोध आहेत.. जसे महाराज आपणस प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्यास सांगत आहेत.. नामावर चित्त स्थिर करण्यास सांगत आहेत.. !